कथाश्री २०१४
कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे.
या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.
- कुमार सप्तर्षी यांची मुलाखत त्यांची राजकीय जडण घडण , सामाजीक भान आणि वैचारीक स्पष्टता अगदी तपशीलवार उलगडली जाते. आजच्या राजकीय प्रगल्भतेच्या (दिवाळखोरीच्या) पार्श्वभूमीवर त्यांची पक्षविरहीत मते नक्कीच विचारात पाडतात
- दुसरी मुलाखत ही विनय सहस्त्रबुद्धे यांची "रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी" च्या वाटचालीबद्दल आणि योगदानाबद्दल आहे. राजकीय क्षेत्रातही प्रबोधनाची किती गरज आहे हे आपण भूछत्राप्रमाणे उगवणार्या गल्ली नेत्यांच्या फलकबाजीतून रोज अनुभवत आहोतच
- तिसरी मुलाखत चतुरंग प्रतिष्ठान संक्ल्पना आणि विविध उपक्रमांचा वेध घेणारी आहे. एखाद्या व्यासंगाने झपाटलेली व्यक्ती काय झेप घेऊ शकते त्याचे उदाहरण म्हणजे चतुरंग प्रतिष्ठान !
- स्त्री स्न्मान आणि स्त्री आत्मभान. आपलं आयुष्य हे आपलं आहे ही जाणीव असेल, तसं स्वातंत्र्य असेल.
💬 प्रतिसाद
(2)
व
विशाखा पाटील
Wed, 02/04/2015 - 06:28
नवीन
छान ओळख! धन्यवाद. पण बुकगंगावर २०१४ चा अंक उपलब्ध नाही.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 02/04/2015 - 12:12
नवीन
कथा श्री २०१४
- Log in or register to post comments