एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे
२०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे .
ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील .
आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे .
मोदींचा उदय व दाभोलकर यांची हत्या यांची सांगड घालणाऱ्या ह्या थोर विचारवंतास आमचा साष्टांग नमस्कार .
राजकीय मतभेद कितीही असोत पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय आखाड्यात रुपांतरीत होताना बरे नाही दिसत.
(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )
>>> धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला.हो ना. मिपाच्या कोणा जेष्ठ संपादकाबद्दल धागा आहे कोणास ठाऊक असं वाटलं.हो ना ! "कोण तो मिपाचा जेष्ठ संपादक?" आणि "आता त्रिशतकी रणधुमाळी वाचायला वेळ राखून ठेवायला पाहिजे" असे म्हणत धागा उघडला, तर हे ! (निवडणूकांची रणधुमाळी अंगवळणी पडल्याने मिपावरची रणधुमाळी जास्त मनोरंजक वाटणारा) इए :)(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )नक्की थण्डगार पाणीच की दुसरे काही? इकडची मारामारी बघून आता मलाही मद्यमन्दिरात प्रवेश करावासा वाटू लागला आहे ! ;)United States of Indiaतुमच्या सहीला माझा आक्षेप आहे .. भारत हा United States of India नाही ! ते एक संपूर्ण एकसंध राष्ट्र आहे !! आणि अनादी अनंत कालापासून जेव्हा " राज्य" ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती, भारत हे एक "राष्ट्र" म्हणूनच जगाला परिचित आहे. संघराज्य असायला हे काही अमेरिकेसारखे अनेक राज्याचे, अनेक देशातून स्थलांतरीत झालेल्या लोकांचे आणि विविध संस्कृती आणि उपासना पंथ असणार्या लोकांचे 'कडबोळे' नाही की जे मुद्दामहून "युनायटेड" करावे. ते मूलत: समान श्रद्धामूल्ये असणार्या आणि एकच जीवनपध्द्ती असणार्या एकसंघ समाजाचे सनातन भौगोलिक स्थान आहे. काही संकल्पना मूळातूनच तपासण्याची आवश्यकता आहे. आमची अवस्था बदकात सापडलेल्या राजहंसासारखी आहे , आमची ओरिजनॅलिटी आम्हाला माहीतच नाही !आणि मग आमचे तारु ही उधार पाश्चिमात्य संकल्पनावर भरकटते !आणि बदकांच्या गर्दीत राजहंस "कुरुप-वेडे" ठरतात ! मला या संधीसाधु पण त्यामानाने तात्कालिक प्रिणाम करणार्या राज कारणापेक्षा स्वत्व हरवलेल्या भारतीय समाजाची चिंता वाट्ते .. हे असली आतविसमृती सार्वकालीक विनाशाकडे नेणारी आहे. राजकारणाने केलेला विनाश कालौघात भरुन निघेल , निघतो ही ! मोदी आत्ता सत्तेवर आले नाहीत म्हणून फारसे बिघड्णार नाही.. पुन्हा एखादा मोदी सत्तेवर आज नाही तर उद्या जन्माला येईलच ! राज कारणाने फारसे बिघडत नाही .. पण समाजकारणाचा कणा मोडला तर येणारी १०० वर्षे केवळ विनाशाकडे नेतील.. ही शोकांतिका समजून घ्यायला हवी. राजकारणाचे काय हो , पापी औरंग्या , शक , हूण आणि धूर्त इंग्रज ही शासन करुन गेले पण समाजाचा कणा इतक्या आक्रमणापुढे देखील अभेद्य राहीला. पण सध्या मात्र जे सांस्कृतिक आक्रमण होते आहे त्यापुढे आपण अक्षरशः गुडघे टेकले आहेत !!! असो लेखनाच्या भरात खूपच लिहिले गेले. धाग्याचा हा विषय नव्हे तेव्हा भरकट्ल्याबद्दल क्षमस्व ! काही गोष्टी जागीच दुरुस्त केलेल्या बर्या म्हणून हा प्रपंच ! जमल्यास सुयोग्य बदल करावा ही विनंती !