भावनिक गुंता (सल्ला हवाय )
२००६ साली मी पुण्यात होतो . आमच्या भावकीतील एक मुलगा लातुरात राहता असे .घर ची हालत
चांगली नव्हती . हा मुलगा लहान सहान कामे करत असे
पण संगती मुळे, बिघडण्यास सुरवात झालती .
त्याच्या आईने मला विनंती केली कि मी त्यास पुण्यात बोलवून घ्यावे आणि कुठे तरी कामाला लावावे .
मी नकार देऊ शकलो नाही .
मी त्याला पुण्यात बोलावून घेतले आणि त्याच्या नोकरी साठी प्रयत्न करू लागलो . मला यश आले नाही
पण त्याने स्वतः एक वेल्डिंग हेल्पर ची नोकरी मिळवली . पगार जेमतेम होता पण त्याला पुरेस होता .
कंपनीने पुण्यातील रहिवाशी असल्याचा पुरावा मागितला . माझ्या ताई ने त्याचे नाव स्वतः च्या रेशन कार्ड वर घेतले . त्याला नोकरी मिळाली .३ वर्ष्यात हेल्पर पासून सुपर वायझर झाला . २००८ मध्ये त्याची आई आजारी पडली .२०१० मध्ये मृत पावल्या . त्या माउलीला शब्द दिलता कि मुलाला साभाळून घेईन.
हा शब्द पाळणे मला आज जड जात आहे .
कारण ,
२०११ साली त्या मुलाच्या आयुष्यात एक मुलगी आली . मुलगी हि जास्त शिकलेली नव्हती . मध्यम वर्गीय
पर जातीय ,मुलीच्या घरी एक लहान बहिण , वडील नाही , आई नोकरी करून घर चालवते ,
तिचा मामा पुण्यात बिल्डर आहे अस ऎकुन आहे .
दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या शपथ घेतल्या
मुलाला कुणीच नसल्या आणि स्वतः च्या नोकरी मुळे माझा विरोध नव्हता .मुलाला आणखीन २-३ वर्ष लग्न करयचे नव्हते .ती मुलगी माझ्या ताई ला हि एकदा भेटून गेली.
मला पहिला त्रास १ वर्षा पूर्वी झाला .
त्या मुलीच्या पायी त्या मुलाने गेल्या जानेवारीत एक मुलाला मारहाण केली . प्रकरण पोलिस पर्यंत
गेल नाही ,थोडक्यात मिटल .
जून मध्ये त्या मुलीचा मला फोन आला कि , माझे दुसरी कडे लग्न ठरल आहे आणि तो मुलगा मला त्रास देत आहे . हा तिचा मला आलेला पहिला फोन, कारण तो पर्यंत मला तो मुलगाच माहिती देत असे. या वेळी तिने जे सांगितले ते माझ्या साठी धकादायक होते .
हि मुलगी फेब्रुवारीत गरोदर होती ,तिने त्या मुलाला लग्न ची गळ घातली पण मुलाचे स्वतचे घर नाही ,त्यामुळे त्याने काही काळ थांबयाला सागितले . आणि तिचा गर्भपात केला गेला .
आता त्या मुलीला याच्याशी लग्न करायचा नाही .
मी त्या मुलाला भेटून त्या मुली पासून लांब राहण्याचा सल्ला दिला . त्या मुलाने हि मला ठीक आहे म्हणून सांगितले .
काल पुन्हा त्या मुलीने माझ्या ताई ला फोन करून सांगितले कि तो मुलगा मला त्रास देत आहे. (कारण माझा फोन सकाळी बंद होता ) ताई ने गोष्ट मला सांगितली .
तेव्हा पासून माझ्या डोक्यान काम कारण बंद केलय. हे प्रकरण कसे सोडवावे .
*काही सल्ले जे मला काल पासून मिळालेले *
१) त्या मुलाशी संबंध तोडून टाक .(पण त्याच्या आई ला मी शब्द दिलता . त्यचे वडील फार पूर्वीच वारलेत)
२) त्या मुलीला पोलिसात जायचा सल्ला दे . ( पण या मुळे त्या मुलाचे भविष्य संपेल,त्यचे नाव आज हि माझ्या ताईच्या रेशन कार्ड वर आहे , याचा त्रास माज्या ताई ला होऊ शकतो )
३) त्या मुलाला पुन्हा समजावणे ( याचा विपरीत परिणाम होऊ शकतो )
* मी २००७ साली लातूर ला वापस आलो पण तो मुलगा पुण्यातच रुळला .*
*त्या मुलाचे वय आज २५ आहे .*
( सर्वाना विनंती आहे कि भाष्या आणि शुद्धलेखन पाहू नका , आणि या गुंता कसा सोडवावा ,
हे सांगा .)
परका नाही पण स्वतंत्र होचपखल ! पाच शब्दात या प्रसंगातले सर्व शहाणपण मावलेले आहे !