मरण झाले स्वस्त
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट
जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥
महागाईचा आलेख किती वर गेला
कसे जगावे देवा सांग तुच मला
गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥
कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले
कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले
देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥
बाँब स्फोट घातपात येथे घडतात
निष्पाप लोक त्यात बळी पडतात
काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥
दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते
बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते
पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥
पुर आणि भुकंपाने होई नुक्सान
रिलीफ फंडामध्ये जमा करतात धन
टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...॥५॥
................बी.डी.वायळ
💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/04/2013 - 08:46
नवीन
गरीबाचं कोणी नसतं ....आणि देवाला, गरिबांची अजिबात दया येत नाही.
अशा आशयाची कविता पोहचली.
पूर, गाड्यांच्या टकरी, रिलिफ फंडाचा होणारा चुरा. वगैरे हे सर्वही खरं आहे.
पण, हे कवितेतून येतांना त्यात जरा अजून धारदारपणा येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Sun, 08/04/2013 - 17:18
नवीन
धन्यवाद डोक्टरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभार..!
- Log in or register to post comments
त
त्रिवेणी
Sun, 08/04/2013 - 19:03
नवीन
टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...>>>>>>>>>आणि अशा माणसांना ते पचतेही हे नवल. अशी बरीच माणसे पाहण्यात आली आहे.
- Log in or register to post comments