एक प्रवास लोकलचा








माझे मनोगत :--- मुंबई ! करोडो लोक इथे राहतात आणि लाखो रोज पोटाची खळगी भरण्यासाठी इथे येतात.रेल्वे ही मुंबईची धमनी समजली जाते...अव्याहतपणे चाललेल्या फेर्या,क्षमते पेक्षा किती तरी जास्त लोकांना रोज इच्छीत स्थळी पोहचवण्याची सेवा नित्य नियमाने पार पाडली जाते...
पत्ते खेळणारे लोक,भजनी मंडळ,पेन-चॉकलेट, चीनी वस्तु तसेच इतर पदार्थ विकणारे विक्रेते. शिरडी वाले साई बाबा असं भजन म्हणत हातातल्या छोट्या टिपर्या लयीत वाजवत पैसे मागणारी निरागस मुले ! काय पाहावयास मिळेत नाही या प्रवासात ?
प्रत्येक जण इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी अधीर झालेला असतो...
कोणाचा प्रवास सुरु होतो तर कुणाचा संपतो...काही सेकंदातच डब्यातुन उतरणारी व चढणारी माणसे !!! सगळच कसं अचंबीत करणारे...
मी क्लायंटकडे डेन्मार्कला असताना... एकदा गप्पा मारताना सहजच त्यांना विचारले,की तुम्हाला माझ्या देशा बद्धल काय माहित आहे ? ते म्हणाले रेल्वे अपघात ! मला फार वाईट वाटले. :( पण काय बोलणार आपल्या देशात रेल्वे अपघात आता नवलाईची गोष्ट राहिली आहे ? त्यात बॉब्म स्फोट करणार्यांसाठी अगदी सोपे लक्ष ! एका झटक्यात अनेक ठार,शिवाय मिडीया कव्हरेज प्रचंड मिळत असल्याने अतिरेक्याचे आवडते लक्ष !!!
नगरीनिरंजन यांचा जन्मठेप हा धागा वाचला आणि आत कुठेतरी घुसमटायला झालं...
मध्य आणि पश्चिम रेल्वेला ५ नव्हेंबर रोजी ६० वर्ष पूर्ण झाली... रेल्वेची आणि त्यांच्या कर्मचार्यांची सेवा सर्व मुंबईकरांसाठी एक न थांबणारी बहुमोल सेवा आहे. या सेवेला फोटो रुपी मानाचा मुजरा !
*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत.
(प्रवासी)
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }