💬 प्रतिसाद
ड
डावखुरा
Wed, 04/07/2010 - 19:55
नवीन
हा अनुभव जवळपास सर्व पालकांना असत जरी ते हा प्रकल्प स्वतः करत नसले तरी पण तो त्यांच्याच वर्गात लावला जाउन सर्व मुलांना त्याचा फायदा होतो....
त्या निमित्ताने आपणही मुलांकडे लक्ष देतो.....
आता तुम्ही म्हणाल बाजारात तक्ते मिळतात त्याचा वापर शाळेने करावा....
मान्य पण हाताने बनवलेल्या प्रकल्पाची मजा कही औरच...
मुलाला स्वतःच्या तसेच आपल्या वर्गमित्रांच्या प्रकल्पाबद्दल कुतुहल वाटुन बाजरातील तक्त्या पेक्क्षा नक्कीच जास्त वेळ निरीक्षण करेल...
निरीक्षणातुन व प्रकल्पातुन होणारा अभ्यास पुस्तकातील रट्टेबाजीपेक्षा केव्हाही उत्तमच......राजे
आपण मदत करतो म्हणजे तो पुर्ण प्रकल्पच पुर्ण करून तो प्रकल्प मुले फक्त शाळेत पोचता करतात.
(अवांतरःत्यांना सोडायला जाताना आपल्यालाच तो पोचता करायला लागतो....)
"राजे!"
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Wed, 04/07/2010 - 20:02
नवीन
>> तो प्रकल्प पुर्ण न झाला तरी हरकत नाही, मुलांनी शाळेत त्यानी स्वत: प्रयत्न करणे महत्वाचे
इथेच तर सगळी गोची आहे !
आपल्याकडे विषय 'समजून घेण्या'पेक्षा 'पूर्ण करण्यावर' खूप जास्त भर दिला जातो :(
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 04/08/2010 - 00:32
नवीन
लालसा: लहान वयात 'पुठ्ठ्याचे 'घर' बनविणे', मोठ्या कार्डशीट वर चित्र काढणे, क्राफ्ट च्या वहीत प्रत्येक धड्याच्या अनुषंगीक चित्र काढणे कोणत्या मुलांना जमेल हो? तरीही शाळेवाले असली कामे खुपच कमी वयात का देतात?
माझे म्हणणे आहे की त्या त्या वयाच्या मुलाला झेपेल असेच कामे द्या ना. उदा. १/२ री - कागद सरळ कापणे, गोल, चौकोन काढून रंगविणे, क्ले (माती) चा एखादा आकार बनविणे आदी.
मुले अशाच छोट्या गोष्टीतून आपसूक शिकतात.
संदीप चित्रे : खरे आहे. असले प्रकल्प पुर्ण करून घेण्याच्या अट्टहासापाई मुलांचेच नुकसान होते. ते प्रकल्प आपणच पुर्ण करतो अन त्यांच्या वाटेला काहीच येत नाही.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments