💬 प्रतिसाद
(2)
व
विसोबा खेचर
Sun, 03/09/2008 - 07:11
नवीन
थोडक्यातच परंतु चांगलं रसग्रहण!
परंतु व्यंकटराव,
नुसतच पहिलं कडवं वाचलं तर काहीच ध्यानात येत नाही की हा देवाचा अभिषेक आहे की एखाद्या नववधूचा हळद लावायचा कार्यक्रम आहे की अजून काही ?
आपला हा मुद्दा एरवी पटला असता परंतु सुरवातीलाच राधाकृष्णाचा जो फोटू आपण दिला आहे त्यामुळे इतर वाचकांचं माहीत नाही परंतु निदान मला तरी गुलजार साहेब देवाच्या अभिषेकाबद्दलच बोलत आहेत हे समजले. माझ्या मते आपण हा फोटू द्यायला नको होता. तो दिला नसतात तर कदाचित आपला वरील मुद्दा व्हॅलिड ठरला असता!
असो...
देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात पण तिरकस हल्ला करणारी गुलजार ह्यांची ही कविता,
मला तरी त्यांच्या कवितेत कुठे तिरकस हल्ला दिसला नाही. उलटपक्षी श्रीकृष्णाचे थोडेसे कौतुकच दिसते! :)
असो, प्रत्येकाचा बघण्याचा नजरिया वेगळा!
गुलजार एखाद्या गारूड्यासारखे आपला एका पेटार्याच्या आतला दुसरा पेटारा उघडत उघडत ही कविता फुलवतात.
अगदी सहमत आहे...
केवळ १२ ओळींत गुलजार ह्यांनी देव, धर्म आणि रुढींची विकेट घेतलेली असते.
हम्म! कविता वाचून मला तरी व्यक्तिश: तसं वाटत नाही...
असो, आपण आपल्या नजरेतून चांगलेच रसग्रहणवजा विवेचन केले आहे...
पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा!
आपला,
(गुलजारप्रेमी) तात्या.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 03/09/2008 - 16:18
नवीन
कविताही खूपच सुंदर आहे आणि तुमचे रसग्रहणही...
- (सर्वव्यापी)प्राजु
- Log in or register to post comments