भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

भाग ३ - इंटरव्ह्यू चे काही अनुभव !

अनुभव १:
साधारण १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच CISSP ही सायबर सेक्युरिटी मधील अत्यंत मानाची मानली जाणारी परीक्षा पास झालो होतो. मग एका ओपनिंग साठी एका मल्टी नॅशनल कंपनीत माझा एक इंटरव्ह्यू झालेला. पोझीशन मिड मॅनॅजमेण्ट ची होती. मी अगदी वेळेच्या आधी त्या कंपनीत पोहोचलो. अजून एक दोन जण होते. ते बहुदा बिग ४ मधून आलेले असावेत. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. मुलाखत घेणारे पॅनल ३ का चार जणांचे होते. मी आत जाताच त्यांनी एकमेकांकडे सूचक नजरेतून पहिले, आणि काही क्षण माझ्याकडे पाहून मग मला बसायला सांगितले. इंटरव्ह्यू झाला. चांगला म्हणता येईल असा गेला. मी घरी आलो.

मी जरा अधीर आहे. दुसऱ्याच दिवशी HR ला फोन केला आणि फीडबॅक विचारला. HR पाहिल्याने फोनच उचलत नव्हती. सामान्यतः ज्यांची उमेदवारी अजून ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो उमेदवार अजूनही जर रेस मध्ये असेल तर HR त्याचे फोन उचलते. रिजेक्ट झालेल्या उमेदवारांचे फोन HR उचलत नाही असे मला अनुभवाने समजले आहे. शेवटी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला तर तिने उचलला. आणि कोरड्या स्वरात सांगितले की मी रिजेक्ट झालेलो आहे. इंटरव्ह्यू तर चांगला गेला होता. मी खट्टू झालो. त्याच कंपनीत ज्या मित्राने रेफर केले होते त्याला काय झाले म्हणून विचारले.
त्याने मला विचारले ... तू अटायर काय घातले होतेस. मी म्हणालो ... फॉर्मल शर्ट, ट्राउझर आणि ऑफिस शूज. त्याच्या पुढचा प्रश्न : आणि सूट ? मी म्हणालो नाही मी कधीच सूट घालत नाही. तो थोडा चिडला .... म्हणाला ....यापुढे प्रत्येक इंटरव्ह्यू ला सूट घालत जा.... आता तू मिड मॅनेजमेंटचा उमेदवार आहेस.... स्वतःला छान प्रेसेंट केलेस तर चांगल्या किमतीत विकला जाशील .....

अनुभव २:
अगदी काही महिन्यांपूर्वी मी एक इंटरव्ह्यू दिला होता. मिड मॅनेजमेंटचाच रोल होता. टीम्सवर मीटिंग वर interview होता. मी सूट बिट घालून बसलो होतो.
पहिलाच प्रश्न [इंग्रजीतूनच होता ]:
कौस्तुभ , तुला जर कंपनीच्या CEO ला प्रेसेंट करण्यासाठी २ PPT स्लाईड्स बनवायला सांगितल्या, आणि तुला त्या दोन मिनिटात प्रेसेंट करायच्या आहेत, तर तू त्या PPT स्लाईड्स मध्ये काय दाखवशील?
मी असा प्रश्न कधीच फेस केला नव्हता. आणि असा काही प्रश्न येईल असे कधी वाटले ही नव्हते. पण मग काहीतरी जुळवा जुळव करून उत्तर दिले. पण मुलाखत घेणाऱ्याला ते काही पसंत पडले नाही. त्याने पुढील मुलाखत घ्यायची म्हणून घेतली.
पुढे काय झाले ते सांगायची गरज नाही.

अनुभव ३:
एका ** ४ मध्ये डायरेक्टर पोसिशन ला अर्ज केला होता. पहिले २ राउंड मस्त गेले, HR एकदम गोड गोड बोलत होती. [हलाल ची आठवण येत होती]. आता फक्त सॅलरी डिस्कशनचा राउंड होता. पण तिथे HR न येता कोणीतरी VP आला. म्हणाला, तुझे दोन्ही राउंड चा फीडबॅक एक्सलंट आहे. वि आर गुड टू प्रोसिड. मी खुश झालो.
त्याचे पुढील वाक्य गुगली होती. तो म्हणाला , as अ डायरेक्टर तुला ****** चा बिसनेस दर चार महिन्यांनी आणावाच लागेल. आणि हे काम तुझ्या इतर ग्राहकांचे काम सांभाळून करावे लागेल. मी असे सेल्सचे काम कधीच केले नव्हते. आणि मला ते जमत ही नाही.
एखादा असता तर नवीन चॅलेंज म्हणून सरळ हो म्हणून जॉब घेतला असता. मी मात्र स्वतःची मर्यादा ओळखून स्पष्ट पण नम्र नकार दिला. कदाचित मी फारच कंझर्वेटिव्ह वागलो असेल., उत्तम संधी गमावली असेल ....
पण मला रात्रीचा दिवस करून आणि माझी हेल्थ विकून पगार विकत घ्यायचा नव्हता आणि नाही. ज्यांना चॅलेंज घ्यायची आहेत त्यांनी खुशाल घ्यावी ....

अनुभव ४:
एकदा कुवेतला एक ओपनिंग होती त्यासाठी मुंबईला एका कंसल्टंसीत गेलेलो. ती कन्सल्टन्सी शोधेपर्यंत त्यात जाईपर्यंत १० मिनिटे लेट झाला. कुवेतच्या मुलाखत घेणाऱ्याने एक टोन्ट मारला. म्हणाला "तुम्ही फार लांबून आलेले दिसता" ... मी म्हणालो ... हो ... पुण्यातून ... २०० किमी आहे.
तो म्हणाला ओह्ह आय गॉट नाऊ .... इतक्या लांबून आलात म्हणून तुम्हाला उशीर झाला .... मी कुवेत वरून वेळेत आलो .... कदाचित कुवेत पुण्यापेक्षा जवळ असेल मुंबईच्या ....
मी खाली मान घातली ... पुढे तो माझ्या cv कडे पाहून म्हणाला .... तुम्ही या जॉब साठी खुपच लहान आहात हो ... आम्हाला निदान १८ वर्षे तरी पूर्ण असलेला उमेदवार हवाय....
माझे वय तेव्हा ३३ होते.... मला काही कळेना .... तितक्यात त्याने माझ्या पुढे माझा cv टाकला आणि बर्थ डेट दाखवली ..... ती बर्थडेट ची तारीख त्याच दिवसाची होती ....

अनुभव ५:
मी काही महिन्यापूर्वी मॅन्युफॅक्चरिंग सोडून IT मध्ये डेस्कटॉप अभियंता म्हणून जॉईन केले होते [हा अनुभव तर खूप विचित्र होता .... कधी लिहीन असे वाटत नाही]. आमचे कॉन्ट्रॅक्ट संपणार होते म्हणून परत जॉब शोधात होतो. एका ओळखीतून एका कंपनीत मुलाखतीला गेलो. मला आधीच समजले होते की माझा आहे तो पगारच त्या कंपनीच्या [मी जिथे मुलाखत देणार होतो त्या ] बजेटपेक्षा थोडा जास्त आहे. पण ओळखीतून गेलो होतो म्हणून बहुदा माझा इंटरव्ह्यू ठेवला असावा. इंटरव्ह्यू सुरु झाल्यावर मुलाखत घेणाऱ्याने मला खूप अवघड प्रश्न विचारले. मी अजूनही या क्षेत्रात नवीन होतो. मला काही सांगता येईना. प्रत्येक प्रश्नानंतर मुलाखत घेणारा मला डिस्करेज करत होता. एकदाची मुलाखत संपली.
तो म्हणाला, कौस्तुभ तुला तर काहीच येत नाही रे. .. आमच्या काल जॉईन झालेल्या फ्रेशरला जास्त माहिती आहे तुझ्या पेक्षा ... पण ज्यांच्या ओळखीतून तू आला आहेस त्यांच्यासाठी मी तुला कन्सिडर करेन. पण पगार तुला आता आहे त्याच्या अर्धाच मिळेल. तुला इथे सगळे शिकता येईल ... ३ वर्षांनी तू एक्सपर्ट होऊन बाहेर पडशील ...
माझे नुकतेच लग्न झाले होते. मुळात जो पगार होता तो ५ आकडी पण नव्हता ... त्याच्या अर्ध्यात मी कसे घर चालवणार होतो ?
मी नाही म्हणून घरी आलो .... गाडी चालवताना रडत होतो......
काही वर्षांनी हिंजवडीतील तत्कालीन एका नामांकित कंपनीत तो मुलाखतकार मला पुन्हा भेटला .... त्यावेळी मी त्या नामांकित कंपनीच्या पेरोलवर होतो .... आणि तो मुलाखत घेणारा माझा व्हेंडर ...त्याने मला पाहून ऍप्रिशिएट केले. ...
चक्र पूर्ण फिरते असे म्हणतात .... आता रडायची पाळी त्याची होती ....
पण मी खुनशी नाही .... अगदीच कोणी माझे वाईट केले असेल तरच मी आयुष्यभर त्याच्याशी सूड भावनेने वागतो ....
अशी माणसे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत .... आणि तो मुलाखतकार आज माझा फेसबुक फ्रेंड आहे .... बघूया, हा लेख वाचून मला फोन करतो का ?

तात्पर्य :
१. पहिल्या दोन अनुभवातून शिकलेली दुनियादारी : मुलाखत सुरु होताना पहिल्या २ ते ३ मिनिटात तुमचे जे इम्रेशन मुलाखत घेणाऱ्यांवर पडते तिथेच तुमच्या इंटरव्ह्यूचा निकाल बहुतांश वेळा ठरलेला असतो.
२. मॅनेजमेंट रोल्स साठी जाताना ..... बिग ४ साठी कोणत्याही रोल साठी जाताना नेहमी सूट घालावा.
३. मुलाखतीस नेहमी वेळेच्या आधी पोहोचावे ....
४. हल्ली तुमचे म्हणणे अगदी थोडक्यात पण प्रभावी पणे मांडणे हे अत्यंत महत्वाचे स्किल आहे.
५. तुमच्या CV मध्ये जी माहिती तुम्ही दिलीय ती नीट तपासून पहा. तुमच्या मित्राला किंवा जोडीदाराकडून एकदा पाहून घ्या ....
६. तुमच्या CV ची कधीही गुंडाळी करू नका .... तुम्हालाच तुमचा रिस्पेक्ट नसेल तर तुम्ही ज्या कंपनीत जॉईन करता तिचा रिस्पेक्ट तुम्ही कसे ठेवणार ?
७. समजा तुम्ही रिजेक्ट झालात तर त्याची करणारे शोधा .... रिजेक्ट झाल्याचे दुःख समजू शकतो ... पण त्यासाठी १३ दिवसाचे सुतक पाळायची काही गरज नाही ..... मनात म्हणा
"एक गाव उणं तर दस घर पुणं "

अजून खूप काही लिहिता येईल .... पण सध्या लेखनसीमा !!!

कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२