परवा लल्लन्टॉप या प्रसिद्ध युट्युब वाहीनीवर एक वादचर्चा प्रसिद्ध करण्यात आली. चर्चेचे शिर्षक Does God Exist ? असे होते. या चर्चेत नास्तिकांच्या बाजुने जावेद अख्तर हे होते आणि आस्तिकांच्या बाजुने मुफ्ती शामाईल नादवी हे होते. या सुमारे २ तास चाललेल्या चर्चेची वैशिष्ट्ये म्हणजे
१- चर्चा फारच सुंदर रीतीने करण्यात आली कुठले प्रश्न घ्यावे काय वेळ देण्यात यावी चर्चा कशी करावी हे सर्व पुर्वनियोजित होते आणि तसे अंमलातही आणले गेले.
२- दोन्ही चर्चक अख्तर आणि नादवी उत्तम वक्ते आणि अभ्यासु होते. (नादवी अख्तरांना अकॅडेमीकली भारी पडत होते पण ते एक असो )
३- एक मॉडरेटर म्हणुन श्री सौरव द्विवेदी यांनी आपली भुमिका फार चोखपणे बजावली आणि चर्चेचे उत्तम संचलन केले त्यामुळे चर्चा एका उंचीला पोहोचली.
४-प्रेक्षकवर्ग व स्थान दोन्ही तालेवार होते प्रेक्षकांमधुन सुद्धा उत्तम प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या.
५-तमाम कचरा टेलीव्हिजीन वाहीनींच्या आक्रस्ताळी, किंचाळी चर्चकांना आणि वाईट्ट अशा निवेदकांच्या गालावर या सुसंस्कृत चर्चेने एक सणसणीत चपराक हाणली.
६-तमाम नेटीझन्स नी या चर्चेला अल्पावधीत विक्रमी व्ह्युज देउन ( ३ दिवसात आतापावेतो ५५ लाख ) आणी अक्षरशः हजारो कॉमेंट्स चा पाऊस पाडुन डोक्यावर घेतले.
अशा अजुन चर्चा घडोत हीच सदीछा. कोणाची कुठलीही बाजु असो प्रेक्षकांना चर्चेतुन छान मुद्दे मिळाले.
आता यामध्ये आस्तिकांच्या बाजुने मांडणी करणारे मुफ्ती यांनी एक प्रश्न विचारला की जगातील वस्तुनिष्ठ नैतिकतेचे अधिष्ठान काय आहे तुम्हा नास्तिकांच्या मते ? हे सांगा आमच्या मते ईश्वर हाच जगातील मानवी वस्तुनिष्ठ नैतिकतेचे अधिष्ठान आहे. ( आपके पास ऑब्जेक्टीव्ह मोरालिटी का कोइ फाऊंडेशन नही है ) पुढे मुफ्ती यांनी प्रश्न विचारला की तुम्हा नास्तिकांच्या जगात वस्तुनिष्ठ नैतिकता कशी ठरवणार ? यावर जावेद अख्तर यांना खरे म्हणजे चांगले प्रत्युत्तर जमलेच नाही. अख्तर म्हणाले की
मेजॉरीटी ठरवणार की काय चांगले आहे काय नाही. त्यावर मुफ्ती म्हणाले की जसे जर्मनीच्या मेजॉरीटी ने ठरवले की ज्युंचे जेनोसाइड हे योग्य आहे तर तुम्ही म्हणाल की ते योग्य आहे ? यावर जावेद म्हणाले की त्यावेळेस सर्व पृथ्वीतलावर ग्रहावर जितके लोक होते त्यांचे मेजॉरीटी मत असे होते का की जेनोसाइड व्हावे या अर्थाने ? त्यावर मुफ्ती म्हणाले की अच्छा सर्व पृथ्वीग्रहाची मेजॉरीटी ठरवणार तर मग संपुर्ण पृत्थ्वीवर धर्म मानणारे जे आहेत ते बहुसंख्य आहेत मग तुम्ही धर्म का मानत नाही ?
एकुण जावेद अख्तर यांना मुफ्तीने बर्यापैकी जेरबंद केले.
माझ्या मते जावेद अख्तर हे एक उत्तम शायर, भाषाप्रभु वगैरे आहेत यात वाद नाही मात्र ते उत्तम अभ्यासक असे काही फारसे वाटत नाही. त्यंना मुफ्ती ने मांडलेले मुद्दे समजुन घेण्यातही अडचण येत होती, ते अनेकदा चाचपडत अडखळत होते तर ते एक असो.
माझे ही चर्चा पाहतांना मुफ्ती यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दोन बाजुने केलेले तर्क आठवले. मुफ्ती यांचा महत्वाचा प्रश्न की वस्तुनिष्ठ नैतिकता अशी काहीही अस्तित्वात असु शकत नाही. ईश्वर हाच मानवी नैतिकतेचे अधिष्ठान आहे. म्हणजे ईश्वर आहे त्याचा न्याय आहे त्याची भिती आहे तो आपल्या पापाची शिक्षा देईल आणि सुकर्माची सुफळे देइल हे निश्चीत आहे. आणि म्हणुनच ईश्वर प्रेरीत मानवी नैतिकता जगात अस्तित्वात आहे. वस्तुनिष्ठ ईश्वर अस्तित्वा व्यतिरीक्त स्वतःच्या पायावर उभी असणारी वस्तुनिष्ठ नैतिकता संभवतच नाही अशा अर्थाचे मुफ्ती यांचे आर्ग्युमेंट होते.
याचाच असा अर्थ की ईश्वर नसेल किंवा नसता तर कोणीही नैतिक राहणार नाही नसता. मानवी नैतिकता स्वतंत्र असुच शकत नाही तिचा आधारस्तंभ ईश्वर हाच आहे.
हे आर्ग्युमेंट जुनेच आहे. विवेकानंद सुद्धा हेच आर्ग्युमेंट थोडे वेगळ्या अर्थाने अद्वेत बाजुने करतात. विवेकानंद विचारतात की अद्वैतवाद ज्या शुद्ध-बुद्ध-मुक्त-नित्य ब्रह्म तत्वाचे प्रतिपादन करतो जे की सर्व मानव प्राणि वनस्पती सर्व सर्वांत विराजमान असे तत्व आहे तेच खरे मानवी नैतिकतेचे अधिष्ठान आहे. विवेकानंद विचारतात की माणसाने माणसाला का मारु नये किंवा दुख देऊ नये इ. कारण की सर्वात तेच ब्रह्म तत्व विराजमान आहे म्हणुन इतरांप्रति केलेली हिंसा ही स्व प्रतिच होणार इत्यादी. अशाच लाइन वर त्यांचे आर्ग्युमेंट असे
या वरील मांडणीचा प्रतिवाद करतांना मला दोन संदर्भ महत्वाचे वाटतात
एक तात्विक अंगाने या वरील मांडणीच्या विरोधात उत्तम आर्ग्युमेंट जे केलेले आहे ते इमान्युएल कांट या विख्यात तत्ववेत्याने नैतिकते संदर्भात ईश्वरनिरपेक्ष अशा नैतिकतेची मांडणी केलेली आहे.
दुसरे म्हणजे the god delusion या ग्रंथात Richard dawkins यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणातुन माणुस उत्क्रांत होत असतांना उत्क्रांतीच्या अंगाने मानवात नैतिक आचरण नैतिक गुण कसे विकसीत होत गेले व ही नैतिकता कशी सर्वस्वी ईश्वर निरपेक्ष अशी आहे यांचे उत्कृष्त असे विवेचन केलेले आहे.
या दोन्हीचा वापर जावेद अख्तर यांना करण्याची संधी होती ती त्यांना करता आली नाही अन्यथा चर्चेत अजुन सखोल उहापोह झाला असता.
वरील दोन्ही कांट आणि डॉकीन्स यांच्या मांडणी विषयी पुढील भागात लिहितो तुर्तास कंटाळा
तोपर्यंत मान्यवरांचे या संदर्भातील विचार जाणुन घेण्यास आवडतील.
ही चर्चा अवश्य पाहावी याचा दुवा इथे.
https://www.youtube.com/watch?v=sejkUeZS3dU