काल मराठी राजभाषा दिन होता.
त्या निमित्ताने मनात एक मजेशीर आणि रोचक विचार आला .
" तुमच्या लेखी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्य कोणते ?"
म्हणजे फक्त एकच वाक्य असे नाही, 2 3 वाक्ये असतील तरी चालेल, एखादी कविता किंवा त्या कवितेतील ओळही चालेल.
पण असं काहीतरी विशेष की जे ऐकून तुम्हाला वाटत " अहाहा काय लिहिलं आहे !!".
प्रश्न वाटतो सोप्पा पण आहे अवघड. मी ज्या लोकांना विचारलं तर लोकांना मराठी पेक्षा संस्कृत मधील असे वाक्य सहज सुचले ... जसे की सत्यमेव जयते. ( अर्थात सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करून जे शिकले आहेत त्यांना ह्या उपनिषदातील वाक्याची घनता लक्षात येणार नाही.)
मला स्वतःला " तत्त्वमसि " हे वाक्य प्रचंड सुंदर वाटते.
आणि फक्त अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे वाक्य असले पाहिजे असे नाही. गीत गोविंदात जयदेव कवींनी जे लिहिले आहे हे कसले लोकोत्तर आहे -
माराङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे तया साहस-प्रायं कान्तजयाय किञ्चिदुपरि प्रारम्भि यत्सम्भ्रमात् ।
निष्पन्दा जघनस्थली शिथिलता दोर्वल्लिरुत्कम्पितं वक्षो मीलितमक्षि पौरुषरसः स्त्रीणां कुतः सिध्यति ॥ ६९ ॥
असे काहीसे मराठीतील सुंदर वाक्य , कविता , तुम्हाला काय सुचते ?
म्हणजे एखाद्या पुस्तकाचे नाव सांगू नका, त्यातील तुम्हाला काय भावलं ते भारी वाक्य काय ते सांगा .
एखाद्या पुस्तकातील परिच्छेद
एखादी काव्यपंक्ती
एखादा अभंग
एखादे पत्रातील वाक्य
एखादे नाटकातील प्रवेश
एखाद्या शिलालेखातील वाक्य
एखादे पत्रातील वाक्य.
.
काहीही
जे तुमच्या लेखी अभिजात मराठी आहे !
बस वाक्य !
अवांतर : हा प्रश्न मी अनेक लोकांना विचारला , त्यानिमित्ताने
" नाही सांगता येत " हे मराठीतील सर्वात सुंदर वाक्य आहे असे तूर्तास निदर्शनास येत आहे =))))