पहलगामचा हल्ला आणि इस्लाम

नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_

याच विषयावर हा धागा आहे. बरेचसे उजव्या बाजूचे विचारवंत हे इस्लाम हे एक जागतिक संकट आहे असे सतत सांगत असतात. जग सोडून द्या पण भारतासाठी तरी आपण त्याचा विचार करायला हवा. म्हणजे खरंच इस्लाम हे भारतासाठी एक संकट आहे का केवळ उजव्या बाजूचे लोक असे म्हणत आहेत म्हणून आपण ते मान्य करायचं का? की त्यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहून मगच ठरवायचं? मला इथे दोन्ही बाजूंचे विचार प्रतिसादातून हवे आहेत. केवळ एकाच बाजूचे नव्हे.
ते मुस्लिम अतिरेकी म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे असेही काही डावे विचारवंत त्यांच्या फेसबुक पेजवर लिहीत आहेत. याच्या समर्थनार्थ ते यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती देखील मेला असल्याचे सांगत आहेत. ते कितपत खरं आहे मला माहित नाही.
समजा इस्लाम हा भारतासाठी संकट असेल तर तो संकट कसा काय आहे? इस्लाम मुळे हिंदूंचं किंवा हिंदूंसहित अन्य धर्मियांसाठी ते त्रासाचं कसं होऊ शकतं? नक्की कशाप्रकारे इस्लाम हा भारतासाठी त्रासदायक ठरू शकतो? आणि समजा हे उजवे विचारवंत म्हणत आहेत त्याप्रमाणे नसेल ; इस्लाम हा भारतासाठी संकट नसेल तर त्यासाठी काही सबळ पुरावे आहेत का? कोणतीतरी एक बाजू घेण्यापूर्वी दोन्हीही बाजू तपासून घेतल्या पाहिजेत म्हणून हा लेख. माझी वैयक्तिक मते जी काही असतील ती असतील परंतु ती सध्या बाजूला ठेवून मला दोन्ही बाजू तपासून पाहायच्या आहेत. जरूर व्यक्त व्हा.