[स्वैर] वाळवी वि० बुरशी
उजव्या डाव्यांचा वर्णपट खुप मोठा आहे पण त्यातील उजवेपण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे कदाचीत अपवाद असतील, नियम नसावेत.
ज्यांना पोलादी पडद्यात आणि इतरांच्या शोषणात आनंद मिळतो ते सहसा डावीकडे झुकलेले असतात. इतरांचे स्वातंत्र्य हे त्यांना आपल्या सत्तेला आव्हान वाटते. त्यांना समाजातील व्यक्तींच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग शोषक उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे शोषण करते आणि ती तिच्या खालच्या व्यक्तीचे. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. डाव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे. त्यामुळे मुक्त स्त्री त्यांना साम्यवाद भ्रष्ट करणारी वाटते. मग मुली मुले पुरेशी ट्रान्सजेन्डर होत नाहीत म्हणून त्यांनी जास्त विचार करू नये, स्त्री पुरुष नसलेला जोडीदार पत्करावा वगैरे, कुटुंब सोडून पथभ्रष्ट होत जावे हे तत्त्वज्ञान माथी मारले जाते.
नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी सुमार बुद्धीची तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. हा सहसबंध आहे, कार्यकारण भाव नाही. डाव्या अत्याचाराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तीनामेन चौकातील हत्याकांड.
मग लक्षात आले आतापर्यंत विकसित झालेले सर्व देश उजवीकडे झुकलेले आहेत. डाव्या विचारसरणीवर आधारलेला देश काही काळ तरी टिकू शकेल याची मला उत्सूकता आहे. मुळात असा देश अस्तित्वात आणण्याची सामान्य जनतेची इच्छा तरी असू शकेल का याचीच शंका आहे.
तारतम्य मध्यममार्गात असते याचे उउजव्याना भान असते मात्र डाव्यांना त्याचा साफ विसर पडलेला असतो.