देव होता, देव आहे, असेल पुन्हा
भावनेच्या ओलाव्यातून रुजेल पुन्हा.
कधी माणसाच्या अंतरंगातून डोकावतो आभाळाच्या सावलीतून पाहील पुन्हा.
नेमके फासे तो फेकतो नेहमी इथे
नेटके दान नशिबी तो देईल पुन्हा .
भक्तिभाव जेव्हा उचंबळून येतो
सुगंध बनून मनातून फुलेल पुन्हा.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
माणसातूनच देव जन्माला येईल पुन्हा.
शब्द होता कान्ह्याने गीतेतून पेरला
आज नाही तर उद्या जन्म घेईल पुन्हा.
----अभय बापट