पहिलाच प्रयत्न आहे,योग आला म्हणून बनवले :).थंडीमध्ये हे मुख्यतः हे लाडू खाल्ले जातात.हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत.
१०० ग्रम हळिव
२वाट्या खोवलेला नारळ
३वाट्या गुळ
३ वाट्या नारळाचे पाणी/शहाळ्याचे पाणी
१/२ वाटी काजू बदाम पुड
१/२ चमचा चमचा जायफळ पावडर
कृती
हळीव स्वच्छ निवडून,नारळाच्या पाण्यात ८ तास भिजवावे.
हळीव , खोवलेला नारळ,गुळ एकत्र करून ४ तास भिजवावे.
हळीव भिजल्यावर हे मिश्रण ३० मिनिटं मंद आचेवर परतावे.
तेव्हा त्यात काजू बदाम पूड,जायफळ पूड टाकावी.
परतल्यानंतर मिश्रण गार करून लाडू वळावे.
रोज एक कोमट दुधाबरोबर खाऊ शकतो.