चालू घडामोडी -श्रीलंका अराजक

आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे.
राष्ट्रपती गोताभये हे राष्ट्रपतीभवनातून पळून गेले आहेत. जनतेने राष्ट्रपतीभवनात घुसून तेथला ध्वजही उखडून टाकला आहे. तिथे जनतेचा कब्जा झालेला आहे.
जनतेने गॉल मधे चाललेले श्रीलंका ऑस्ट्रेलिया मॅचही स्टेडियम मधे घुसून बंद केली आहे.
श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात शिल्लक नाही , ( चीनच्या कृपेने). त्याना कोणी कर्जही देण्यास तयार नाही.
या गोष्टीचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे.
श्रीलम्केसारखा जवळचा देश अराजकतेचा सामना करतोय. जनता रस्त्यावर उतरलेली आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग आहे.
सनथ जयसूर्या या जनतेचे नेतृत्व करायला पुढे आलेला आहे.
परिस्थिती दर तासातासाला अधीकच वाईट होत चालली आहे