शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?
रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली.
कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको?
नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं
“शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”