- 9248 views
आर्यन खान प्रकरण नक्की काय आहे?
गेले काही दिवस सतत बातम्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवत आहेत. नक्की खरे झाले काय हे कळत नाही.
काल क्रांती रेड्कर यांची याचना वाचली आणि वाईट वाटले.
मी वाचलेल्या काही गोष्टी. खर्या आणि खोट्या किती हे माहीती नाहीत.
१. वानखेडे आणि एन सी बी मधील काही अधिकार्यांनी २५ करोड रुपये शहारुख खानला मागितले. त्याने ते न दिल्याने त्याच्या पोराला पकडेले.
२. नवाब मलिक ह्याचा जावई ह्याच आरोपाखाली आत असल्याने ते वानखेडे यांच्या कुटुंबावर आरोप करत आहे.
३. त्यात आजुन अब्राहमिक जातीची भर पडली आहे.
४. वानखेडे यांना चांगल्या कामाबद्दल बक्षीसही मिळाले आहे.
५. आता वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
नक्की काय चालु आहे?