श्रीगणेश लेखमाला २०२१ - शापित

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
#players {
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
border-collapse: collapse;
width: 100%;
margin:auto;
text-align: center;
}

#players td {
border: 1px solid #ddd;
padding: 8px;
}

#players tr:nth-child(odd){background-color: #F0F8FF;}

श्रीगणेश लेखमाला २०२१
पूर्वपीठिका - १
१९९० च्या दशकात खेळलेल्या काही कसोटीपटूंची फलंदाजीतील सरासरी :

सचिन तेंडुलकर५३.७८
राहुल द्रविड५२.३१

मो.अझरुद्दीन४५.०३
स्टीव्ह वॊ५१.०६

ब्रायन लारा५२.८८
ग्रॅहम गूच४९.६६

जॅक कॅलिस५५.३७
अरविंद डिसिल्वा४२.९७

रिकी पॉन्टिंग५१.८५
अँडी फ्लॉवर५१.५४

पूर्वपीठिका - २
प्रसंग : क्रिकेट वर्ल्डकप १९९६ - उपांत्य फेरी सामना
निमित्त : भारत विरुद्ध श्रीलंका, १३ मार्च १९९६
स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता

आता, वरच्या यादीत एक खेळाडू असायला हवा, ज्याची सरासरी ५४.२० होती. म्हणजे समकालीन फलंदाजांमध्ये केवळ जॅक कॅलिस त्याच्या पुढे होता.
एकवीस वय असताना कसोटीत पदार्पण केलेल्या या खेळाडूने पहिल्या सात सामन्यात दोन द्विशतके व दोन शतके अशी जबरदस्त कामगिरी केली होती.
तरीसुद्धा कारकिर्दीच्या तीन वर्षात त्याला केवळ १७ सामने खेळायला मिळाले. ज्यात त्याने ५४.२० ची सरासरी नोंदवली. सर्वकालीन कसोटी फलंदाजी सरासरीमध्ये हा खेळाडू एकोणिसाव्या क्रमांकावर आहे.
दुर्दैवाने त्याची कसोटी कारकीर्द सतरा सामने खेळून केवळ पस्तीस महिन्यात संपली.
विनोद कांबळी

प्रेक्षणीय फटके, flamboyant व्यक्तिमत्व आणि सोन्याच्या दागिन्यांची आवड.... espncricinfo साईटवर त्याच्या प्रोफाइलमध्ये लिहिल्याप्रमाणे विनोद कांबळी हा 'वेस्ट इंडिया'चा कमी आणि 'वेस्ट इंडीज'चा खेळाडू जास्त वाटायचा.

विनोद कांबळीचा विषय निघाला की सचिन तेंडुलकरचा उल्लेख होतोच. विशषेतः त्या दोघांनी हॅरिस शिल्ड स्पर्धेत केलेल्या ६६४ धावांच्या भागीदारीचा. सोळाव्या वर्षी सचिन रणजी खेळू लागला आणि वर्षभरात विनोदसुद्धा. विनोदचं रणजी पदार्पण पहिल्या बॉलवर षटकार लगावून झालं, हा योगायोग नक्कीच नसावा. लवकरच सचिनला पाकिस्तान दौऱ्याची संधी मिळाली आणि तिथे पाकिस्तानी तोफखान्याला तोंड देणारा मुलगा म्हणून सर्वांच्या नजरेत सुद्धा आला. त्यावेळी विनोदची निवड एकोणीस वर्षाखालील संघात झाली होती. युवा आशिया कप स्पर्धेत त्याचे संघ सहकारी अजय जडेजा व सौरव गांगुली होते. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मात्र विनोदला अजून काही काळ थांबावं लागलं.
१९९१ मध्ये शारजामध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने एकदिवशीय सामन्यात पदार्पण केलं, पण त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.
१९९३ सुरु होताना विनोदने कसोटीत पदार्पण केलं. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील पहिली कसोटी. पहिल्या सामन्यात विनोदने काही उल्लेखनीय केलं नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतक केलं. तिसऱ्या सामन्यात त्याने थेट द्विशतक झळकावत २२४ धावा तडकावल्या!!! तर पुढच्याच म्हणजे कारकिर्दीच्या चौथ्या सामन्यात त्याने २२७ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या व चौथ्या सामन्यात तो दहा वर्ष अबाधित असलेला सुनील गावस्कर यांचा एका डावातील सर्वाधिक धावांचा (२३६) भारतीय विक्रम मोडण्याच्या इतका जवळ आला होता.

लवकरच सहाव्या व सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन शतके झळकावून त्याने आपल्यात सार्वकालीन महान फलंदाजाची गुणवत्ता असल्याचं सिद्ध केलं. हे सर्व घडलं त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या केवळ आठ महिन्यात! त्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत त्याने अजून दोन अर्धशतकं केली.
विनोदची कारकीर्द सुरु होऊन तेरा महिने झाले होते.
त्याची कसोटी कामगिरी अशी होती:

  • १० कसोटी सामने (खरं तर ९. एका सामन्यात पावसामुळे एकूण केवळ बारा षटकांचा खेळ होऊ शकला होता)
  • ११ डाव
  • ९३७ धावा
  • ९३.७० सरासरी

१९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील तीन डावात त्याने दोन शतके केली.

केवळ चौदाव्या डावात त्याने १००० धावांचा टप्पा ओलांडला. भारतीय क्रिकेट मध्ये अजूनही हा विक्रम विनोद कांबळीच्या नावे आहे. विनोद अवघ्या वर्षभरात यशाच्या शिखरावर होता. तेरा महिन्यांत दहा कसोटी सामने खेळून अशी आकडेवारी असलेला खेळाडू पुढे काय करू शकतो, याचे लोकांनी कल्पनेचे इमले बांधायला सुरुवात केली.
पण काहीतरी बिनसलं!!
साल १९९४.
वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील तीन डावात विनोदने दोन अर्धशतके केली. त्यावेळी त्याला किंवा खरंतर कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल कि ही त्याची शेवटची चांगली खेळी आहे. नंतर भारताने मार्चमध्ये न्यूझीलंड दौरा केला तेव्हा त्याला एका कसोटीत संधी मिळाली ज्यात त्याची कामगिरी समाधानकारक झाली नाही.ही त्याच्या कारकिर्दीच्या शेवटची सुरुवात होती. त्याने दोन डावात नऊ आणि एकोणीस धावा केल्या. त्यानंतर वर्ष संपताना वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यात आला. तीन कसोटीत विनोदच्या धावा होत्या ४०, ०, ०, ६, १८, ०
विनोदला संघातून वगळले गेले. दहा महिन्यानंतर ऑक्टोबर १९९५ मध्ये न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना विनोदला पुनरागमनाची संधी मिळाली. पण त्याने निराशा केली. त्याला सहा डावात दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने २७ आणि २८ धावा केल्या. त्याला पुन्हा वगळले गेले.
तसं विनोदचं एकदिवशीय सामने खेळणं सुरु होतं. पण त्यातसुद्धा विशेष सातत्य नव्हतं. तब्बल नऊ वेळा त्याला पुनरागमनाची संधी मिळाली. कारण प्रथम श्रेणीमध्ये तो चांगला खेळायचा. प्रथम श्रेणीत ५९.६७ च्या सरासरीने त्याने पस्तीस शतकं व ४४ अर्धशतकं केली. मात्र १९९६ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील त्या अप्रिय घटनेनंतर एकदिवशीय सामान्यातूनही विनोद कमीच दिसू लागला.

जून १९९६ मध्ये भारत इंग्लंड दौऱ्यावर गेला. तेव्हा त्या दौऱ्यात विनोद नव्हता. दोन नवे खेळाडू होते. दुसऱ्या कसोटीत त्यातील एकाने शतक केले तर दुसऱ्याचे शतक केवळ पाच धावांनी हुकले.

त्यानंतर विनोदाचे पुनरागमन अशक्य झाले. आणि अभूतपूर्व म्हणावी अशी सुरुवात झालेली एक कारकीर्द अपयशाच्या पायरीवर संपली.
आकडे दाखवतात कि विनोद कांबळी हा एक महान खेळाडू होता. पण खरं तर तो महान होता होता राहून गेला. सांख्यिकीविषयी असं म्हटलं जातं की statistics reveal a lot but not everything. किंवा आकडे खूप काही दाखवतात पण सर्वकाही नाही. या विधानाचं 'विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द ' इतकं चांगलं उदाहरण क्वचितच मिळेल.


संदर्भ :
https://www.espncricinfo.com/player/vinod-kambli-30009
https://en.wikipedia.org/wiki/Vinod_Kambli
https://wisden.com/stories/podcast/vinod-kambli-what-went-wrong-with-sa…
https://www.cricketcountry.com/articles/when-vinod-kambli-featured-alon…