मनोरंजक किस्से

body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding-bottom:16px;background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");}
#borderimg {
border: 10px solid transparent;
padding: 15px;
border-image: url(https://i.postimg.cc/GhRwyFRv/border.png) 30 stretch;
}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
hr{border:0;border-top:2px solid #ccc;margin:20px 0}

अनुक्रमणिका

मनोरंजक किस्से

क्रिकेट मैदानात अत्यंत गांभिर्याने खेळले जात असले तरी मैदानात अनेक विचित्र व हास्यास्पद प्रसंग घडत असतात. काही वेळा नियमांचा गैरवापर किंवा स्पष्ट नियम नसल्यामुळे खेळाडूंनी गैरफायदा घेतलेला आहे. असेच काही मनोरंजक प्रसंग . . .

प्रेशरचा परीणाम
१९८८ मध्ये न्यूझीलंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. बंगळुर कसोटीच्या आदल्या दिवशी न्यूझीलंडच्या ५ खेळाडूंना भारतीय जेवण बाधल्याने ते आजारी पडले होते. तरीसुद्धा ते खेळत होते. परंतु सामना सुरू असताना काही जणांना अस्वस्थ वाटत असल्याने शेवटी पूर्वीच निवृत्त झालेला व समालोचन करणारा जेरमी कोनी व अजून एक समालोचक केन निकोल्सन राखीव खेळाडू म्हणून मैदानात आले. काही वेळानंतर इवेन चॅटफिल्ड गोलंदाजीला आला. तो चेंडू घेऊन धावत स्टंपापर्यंत आला व चेंडू न टाकता तसाच धावत पुढे गेला. नंतर फलंदाज व यष्टीरक्षकाला ओलांडून तो धावत जाऊन पॅव्हिलियन मध्ये गेला. सर्व खेळाडू व प्रेक्षक पूर्ण गोंधळून पहात होते. नंतर समजले की त्याला पोटात कळा येऊन जोरदार प्रेशर आले होते. त्यामुळे चेंडू न टाकता तो धावत जाऊन थेट टॉयलेट मध्ये घुसला.

missingइवेन चॅटफिल्ड
याचीच पुनरावृत्ती २०१७ मध्ये गहुंजे कसोटीत झाली. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी सुरू केल्यानंतर वॉर्नर व रेनशॉ सलामीला आले. जवळपास दीड तास फलंदाजी करून वॉर्नर बाद झाल्यानंतर वॉर्नर बरोबर रेनशॉ सुद्धा पॅव्हिलियन मध्ये गेला कारण त्याला जोरदार प्रेशर आले होते.

missingमॅट रेनशॉ
नियम नसल्याचा गैरफायदा
४० वर्षापूर्वी म्हणजे १५ डिसेम्बर १९७९ मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस सिरीज सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली बॅटिंग करत होता तेव्हा त्याने आयन बोथमचा एक बॉल एक्स्ट्रा कव्हरला तडकावला आणि एक मोठा आवाज झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ८ विकेटवर २१९ अशी होती. आवाज कसला झाला याचा तपास केला गेला तेव्हा लिली लाकडाऐवजी अल्युमिनीयम पासून बनविलेल्या बॅटचा वापर करत असल्याचे लक्षात आले. लिलीने ही बॅट १२ दिवस अगोदर झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात वापरली होती पण तेव्हा कुणी आक्षेप घेतला नव्हता.
इंग्लंड विरुद्ध सामन्यात मात्र इंग्लंडचा कप्तान माईक ब्रियर्ली याने या बॅटमुळे चेंडूचा आकार बदलू शकतो असा आक्षेप घेतला आणि अम्पायरनी लिलीला ही बॅट वापरता येणार नाही असे सांगितले. लिलीने त्यावर क्रिकेट रूल बुक मध्ये लाकडाचीच बॅट वापरली पाहिजे असा कुठेही नियम नसल्याचे निदर्शनास आणून दिले आणि रागाने बॅट फेकून दिली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कप्तान ग्रेग चॅपलने त्याची समजूत घालून लाकडी बॅट वापर असे समजावले. मात्र तेव्हाचा क्रिकेट रूल बुक मध्ये लाकडी बॅटचाच वापर केला पाहिजे असा नियम बदल केला गेला.

missingडेनिस लिली
१५ जानेवारी १८९४ रोजी व्हिक्टोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या स्क्रॅच ११ या दोन संघांमध्ये बॉनबरी मैदानावर एक क्रिकेट सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरच फलंदाजाने जोरदार उंच फटका मारला. फलंदाजाने मारलेला चेंडू मैदानातच असणाऱ्या एका निलगिरीच्या उंच झाडावर जाऊन अडकला. इकडे खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज न थांबता धावा घेत राहिले. जोपर्यंत चेंडू झाडावरून खाली उतरवला जातोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी २८६ धावा काढल्या होत्या. या दरम्यान फलंदाजांनी खेळपट्टीमध्ये जवळपास ६ किलोमीटरचे अंतर धावले होते.
निलगिरीचे झाड मैदानाच्या मध्येच होते. त्यावर चेंडू अडकल्याने गोलंदाजी करणार्‍या संघाने एकामागोमाग एक धावा काढणाऱ्या फलंदाजांना रोखण्यासाठी पंचांना चेंडू हरवला म्हणून घोषित करण्याची विनंती केली. मात्र झाडावर अडकलेला चेंडू स्पष्ट दिसत असल्याने त्याला हरवला म्हणून घोषित करता येणार नाही, असे सांगून पंचांनी विनंती धुडकावून लावली. त्यानंतर कुणालातरी कुऱ्हाड आणण्यासाठी पाठवले, मात्र त्यालाही कुऱ्हाड मिळाली नाही असे सांगण्यात येते.
इकडे झाडावर चेंडू अडकला आहे आणि तिकडे फलंदाज धावा काढत आहेत, यामुले चिंतीत असणाऱ्या गोलंदाजी करणार्‍या संघाने शेवटी कुणाच्यातरी घरून बंदूक मागवली आणि नेम धरून चेंडू झाडावरून खाली पाडला. चेंडू खाली पाडतेवेळी क्षेत्ररक्षण करणारे इतके हताश झाले होते की, त्यांच्यापैकी कुणीही चेंडू झेलायचा प्रयत्न केला नाही. चेंडू जर झेललाअसता तर फलंदाजांनी धावलेल्या सर्व धावा शून्य झाल्या असत्या. चेंडू खाली आल्यावर फलंदाजी करणार्‍या संघाने एका चेंडूत २८६ धावा काढून आपला डाव घोषित केला. हा एक विक्रम आहे.
क्रिकेटबद्दल माहिती देणाऱ्या विश्वसनीय अशा ESPNcricinfo वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका ब्लॉगमध्ये केईकेत लेखक मायकल जोन्स यांनी सांगितले आहे की, या बातमीचा एकमात्र संदर्भ इंग्रजी वर्तमानपत्र Pall Mall Gazette असल्याचे मानले जाते. त्याच वर्तमानपत्राच्या खेळविषयक पानावर याची बातमी छापण्यात आली होती. त्यानंतर ती बातमी इंग्लंड, ऑस्ट्रेलियासहित अमेरिकेतील वर्तमानपत्रातही छापण्यात आली होती.
एका दगडात दोन पक्षी
२००३-०४ मध्ये वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते. मालिकेतील पहिले तीनही कसोटी सामने जिंकून आफ्रिकेने आधीच मालिका जिंकली होती.
त्या मालिकेत आंद्रे नेलने पहिल्या ३ कसोटीत एकूण १७ फलंदाज बाद केले होते. चौथा कसोटी सामना १६ जानेवारी २००४ पासून सेंच्युरियन मैदानावर खेळला जाणार होता. तेथील पाटा खेळपट्टीमुळे चौथ्या कसोटी सामन्यात आपला समावेश संघात होणार नाही असा नेलचा अंदाज होता. त्यामुळे नेल व त्याची प्रेयसी जीन विट्झने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीस आपले लग्न करायचे ठरविले. आमंत्रणे गेली व लग्नासाठी बेनोनी गावातील चर्चही निश्चित झाले.
परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी नेलचा संघात समावेश जाहीर झाला. आता आली का पंचाईत.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थोडा आधी थांबविण्यात आला. नेल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताक्षणी हेलिकॉप्टरने बेनोनीला पोहोचला. त्याच दिवशी संध्याकाळी लग्न पार पडले.
नेल परत येऊन तिसऱ्या दिवशी सकाळी मैदानात उतरला. तिसऱ्या दिवशी त्याने दोन वेळा ब्रायन लाराला बाद करून लग्न साजरे केले.

missingआंद्रे नेल
हा द्वारकानाथ संझगिरींनी सांगितलेला किस्सा -
२००७ मधील विश्वचषक स्पर्धेत एक फलंदाज एका वेगवान गोलंदाजासमोर चाचपडत होता. त्याला धावा करता येत नव्हत्या, पण तो बादही होत नव्हता. मी प्रेक्षकात बसलो होतो. इतक्यात एक बाई उठून गोलंदाजाला हाक मारून मोठ्या आवाजात ओरडली, "Enough of foreplay. Now we want some penetration." (तिचं वाक्य मी इंग्रजीतच ठेवलं कारण काही विनोद इंग्रजीतच चांगले वाटतात. मुख्य म्हणजे चावट वाटत नाहीत). ते ऐकून प्रेक्षकांना हसू आवरले नाही.
कालातीत कसोटी सामना (Timeless Test Match)
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २ फलंदाजांच्या शतके आणि ३ फलंदाजांच्या अर्धशतकांच्या मदतीने ५३० धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव तीन दिवस चालला. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव खेळण्यास सुरुवात केली. परंतु ते केवळ ३१६ धावांवरच गारद झाले होते. इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला पहिल्या डावात शतक साजरे करता आले नाही. इंग्लंडने ३१६ धावा जोडण्यासाठी २ दिवस घेतले. पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना त्रास द्यायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ४८१ धावांवर संपला.
इंग्लंड संघाला विजयासाठी मिळाले होते ६९६ धावांचे आव्हान.
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत ५ विकेटच्या मोबदल्यात ६५४ धावा केल्या. इंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावात एका फलंदाजाने द्विशतक ठोकले, तर दोन फलंदाजांनी शतक साजरे केले. हा कसोटी सामन्याचा १२ वा दिवस होता. जेव्हा १२ वा दिवस संपला, तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ४२ धावांची आवश्यकता होती. परंतु वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड संघाने सर्वांच्या परवानगीने सामना पंचांना अनिर्णित घोषित करण्याची अपील केली. खरंतर इंग्लंडच्या खेळाडूंना जहाजामार्फत समुद्रमार्गाने आपल्या देशात परतायचे होते. अशामध्ये इंग्लंडने १४ मार्चला खेळ संपल्यानंतर सामना मध्येच सोडत पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला. कारण इंग्लंड संघाला सामना जिंकायचा असता, तर त्यांना दुसऱ्या दिवशीही फलंदाजी करावी लागली असती. अशामध्ये त्यांना आपल्या जहाजाचा त्याग करावा लागला असता. शेवटी हा ‘टाईम लेस कसोटी सामना’ संपला. परंतु या सामन्याला कसोटी इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून कायमची ओळख मिळाली.

अनुक्रमणिका