बखरीचं शेवटचं पान

आज लाॅकडाऊनचा "न"वा दिवस.
एक एक क्षण खायला उठतोय.
नियोजित कामाची पार वाट लागलीय.
एका जागी निष्क्रिय राहाणं आता असह्य होतंय.
हे सगळं कधी संपणार ह्याचा काही अंदाजच लागत नाहीये.
अदृश्य लक्ष्मणरेषेच्या पलीकडचा शत्रू काय करेल या विचाराने सुन्न व्हायला होतंय.
या लढाईत हरून पार नेस्तनाबूत झालेल्या भाईबंदांबद्दल शोक करत बसावं की स्वत:ला जपत एक एक क्षण कंठत रहावं ?
निसर्गानं किती विचित्र पेच टाकलाय?
या सार्या उलथा पालथीच्या सुरूवातीला किती सोपं वाटत होतं सगळं?
आपण कधी नामोहरम होऊ अशी कल्पनाही केली नव्हती
पण ह्या प्रदीर्घ लाॅकडाऊनमुळे येणारं वैफल्य, होणारी उपासमार...
.. माझी आता काही खैर नाही
...ह्या हिकमती शत्रूपुढं!
....माणूस नावाच्या!

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}