नोटः रेप कल्चर होत चाललेल्या भारताबद्दल, मी आनखिन काय बोलू हेच कळत नाही. मन उद्विग्न होते हे असले सारे वाचुन , पाहुन. त्यात आपल्या देशात कायदा सुव्यवस्थीत असावा यासाठी, आणि राज्यकर्ते नक्की याला गांभिर्याने घेतायेत का फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात करतात ह्यावर हा सद्यपरिस्थीतीतील द्रुष्टीक्षेप.
According to the NCRB (National Crime Records Bureau ) 4,15,786 rape cases were reported across India between 2001 and 2017. On average, 67 women were raped every day across the country during these 17 years, or, in other words, about three women had been raped every hour.
While 16,075 cases of rape were reported in 2001 across India, this number rose drastically to 32,559 in 2017 - an increase of nearly 103 per cent.
now, Madhya Pradesh reported the highest number of rape crimes (4,882) followed by Uttar Pradesh (4,816), Maharashtra (4,189) and Rajasthan (3,656) .
ही सर्व परिस्थीती काय दाखवते आहे ? आपण रहात असलेल्या देशात आपणच सुरक्षित नाही ? आपण नक्की कोणती महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत ?
कोणत्याही टीव्ही , पेपर मध्ये पाहिल तिकडे अत्याचार, खुन बलात्कार याशिवाय दूसरे काही नाहीच..
फक्त बलात्कार हा शब्द गुगल वर टाकल्यावर कीती तरी घटना डोळ्यासमोर दिसतायेत.. हे नक्की कोणाचे अपयश आहे ? आपले, कायद्याचे की सरकारच्या निष्क्रियतेचे ?
ह्या असल्या बातम्या पाहिल्यावर मान नक्कीच शरमेने खाली जाते, एखाद्या परक्या देशाने ही असली परिस्थीती पाहुन भारतात जावू नका तेथे तुम्ही सुरक्षित नाहि असे जारी केले तर आपण जगाला नक्की कोणता संदेश देवू ?
या विषयावर काय लिहावे, काय करावे, उपाय काय असावे, कायदे काय असावे हे सगळे सगळ्यांकडून बोलून झाले आहे ... कठोर कायदा कदाचीत हाच यावर उपाय असू शकतो .. पण त्यासाठी लागणारा वेळ हा सुद्धा महत्वाचा ठरतो, त्यामुळे जलद गतीने न्याय प्रक्रिया ही असलीच पाहिजे असे वाटते.
झारखंड निवडणुकीतील वक्तव्य आणि पडसाद:
नुकत्याच झारखंड च्या निवडणुक प्रचारात राहुल गांधी यांचे Rape in India ह्या वक्तव्यावरुन , लोकसभेत स्म्रीती इरानी यांनी जोरदार टिकास्त्र वापरले.. पण हे करत असताना, आपण या गोष्टींकडे कश्या पद्धतीने पाहतो, आपले सरकार सध्य स्तिथीत ह्या असल्या केसेस चा आणि इतर वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवुत्तीला कसे कमी करणार आहोत, हे ना त्यांच्याकडुन, ना सरकारकडुन, ना कोणाकडुनच ठोस काही पहावयास मिळते..
या Rape in India ह्या वाक्यासाठी राहुल गांधी यांना माफी मागायला लावताना, जेंव्हा श्री नरेंद्र मोदी यांचा Delhi Rape Capital झाली आहे हा विडीओ फिरवण्यात आला. आणि त्याला उत्तर देता येत नसतानाच. राहुल गांधी यांनी दिल्लीतील सभेत, मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे हे भडक वक्तव्य केले.
खरे तर ह्या वक्ताव्याची गरज नव्हती.. मी माफी मागणार नाही हे येव्हडे वाक्य पुरेशे होते.
इंग्रजाविरुद्ध लढलेले महात्मा गांधी असुदेत,भारतरत्न बाबासाहेब आंबेंडकर असुद्यात, स्वातंत्र्यवीर सावरकर असुद्यात किंवा सुभाष चंद्र बोस असुद्यात किंवा इतर स्वातंत्र्य सेनानी असुद्यात, ह्या सर्वांप्रती आपण आदर बाळागलाच पाहिजे.. काही निर्णय त्या वेळेसच्या परिस्थीतीवर कोणी घेतले असले तरी ते चुक कसे किंवा बरोबर कसे ह्या वादात आता पडून आता असलेली परिस्थीती सुधारणार आहे का कोणी ? ह्या असल्या निष्फळ वादातून, वाक्यातून आपण नक्की काय दाखवतो आहे?
मागे ही हिंदूमहासभेच्या काही लोकांनी महात्मा गांधी यांच्या फोटो ला गोळ्या झाडल्या होत्या, नथुराम गोडसे जो हत्यारा आहेच त्याचे उधोउधो बरेच चाललेले आहे हे ही सर्वशी चुकीचेच.
मला एक कळत नाही, स्वातंत्र्य हे इंग्रजांविरुद्ध हवे होते, ना की कोणा एका जातीसाठी, धर्मासाठी कोणाला स्वातंत्र्य हवे होते. आपण या सर्व नेत्यांना धर्मात, जातीत का बांधतो आहोत. हे असे करुन आपण मुळ बलात्काराच्या उठलेला प्रश्नावर, नंतर ना संसदेत ना कुठल्या विधानसभेत काहीच बोलत नाही हे नेत्यांना कळत नाहियेका?
राहुल गांधीनी माफी Rape in India ह्या वाक्याची मागायची होती हे आपण सोयस्कर रीत्या विसरलो आहे का? आणि या वाक्या वर ना राहुल गांधी नी माफी मागितली पाहिजे ना Delhi Rape Capital झाली आहे या वाक्यावरुन नरेंद्र मोदींनी, त्यांनी या समस्येला आपण कसे थांबवणार आहोत, आपण हा देशाला लागलेला कलंक कसा मिटवणार आहे ह्याची उत्तरे दिली पाहिजेत.. ना की कुठल्या तरी सभेत मतांसाठी कोणाला तरी खुश करण्यासाठी असली वाक्य वापरली पाहिजेत. हे म्हणजे बलात्कराचा बलात्कार करण्यासारखेच नाही वाटत का ?
इकडे महाराष्ट्रात अधिवेशना मध्ये, विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरताना त्याआडुन शिवसेना कशी पुचाट झाली आहे, त्यांचे काही चालत नाही असे बोल लावण्याचा प्रयत्न केला , मला काय म्हणायचे आहे, बलात्कारावर, त्या Rape in India वरुन राज्यात , देशात बलात्कार घटवण्यासाठी काय पावले उचलली जावीत या साठी सभागृह हलवले पाहिजे, तुम्ही या विषयाला हाताळण्यात कमी पडता आहात या वरुन सभागृहात विरोधी पक्षांनी प्रश्न विचारुन उत्तरे मागितले पाहिजेत, ना की कोण कोणती भुमिका का घेत नाही यावर बोलले पाहिजे. तरीही श्री उद्ध्व ठाकरेंनी बलात्काराच्या केसेस २१ दिवसात फास्ट ट्रॅक वर सोडवण्याचा प्रयत्न चालवला आहे हे मला योग्य वाटते. आणि हे जर खरे असेल तर या संपुर्ण प्रकरणात सर्वात यशस्वी उत्तर कोणी काढले असेल तर ते श्री उद्धव ठाकरे यांनी असे मला आता वाटते आहे.
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इन्काँटर
निर्भया झाले, कोपर्डी झाले, उन्नाव झाले आणि हे हैद्राबाद झाले हे देशाला काळीमा फासणारीच कृत्य आहेत. याबाबत कोणाच्या मनात दुमत नसणारच.. आणि ह्या सर्व लोकांना लवकारात लवकर कठोर शिक्षा झालीच पाहिजे..
हैद्राबाद पोलीस इन्काँटर वर येथे बोलण्याचे कारण की, वरती वरती हे खुप योग्य आणि तत्काळ शिक्षा दिसत असली तरी मात्र खोल विचार केल्यास यातील बर्याच गोष्टी पुढे घातक ठरू शकतील असे वाटते.
समजा ते ४ जन आरोपी मारले गेलेले आहेत हे मान्य, पण आनखिन एखादा मुख्य आरोपी त्यांच्यासोबत तेंव्हा तेथे असेल तर तो आता कसा पकडला जाईल?
पोलिसांवर संशय घेत नाहिये मी, पण न्यायप्रक्रिया पुर्ण करून मग शिक्षा किंवा इन्काँटर झाले असते तर वेगळे पण न्यायप्रक्रियाच नाही, हा उताविळ पणा वाटतो.
न्याय प्रक्रिया पूर्ण न होता, आधी बलात्कार झाल्यावर पोलिसांना जे लोक शिव्यांची लाखोली वाहत होते ते आता त्यांचे अभिनंदन करत आहेत, हा पोलिसांचा विजय समजायचा की समाजाची हतबलता ? की न्यायालयाची प्रतारणा ?
याला एकच उत्तर आहे, न्यायालयीन प्रक्रिया फास्ट करण्याचा, आणि यासाठी आपण सर्वांनीच याचा पाठपुरवठा केला पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाला हि आपण supremecourt@nic.in ह्या मेल वर आपण न्याय व्यवस्था फास्ट होण्यासाठी विचारणा करु शकतो.
केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला ला आपण अशी सूचना करु शकतो. तसेच आपण निवडून दिलेल्या नेत्यांना आपण जाब विचारु शकतो, असे काही हि न करता आपण मात्र भावना विवश होऊन हाना, मारा, तोडा असे म्हणत असू तर न्यायालयाचे अस्तित्व कश्यासाठी?
आणि मग इन्काँटर हाच जर न्याय असेल तर आता उन्नाव च्या सेंगर ला दोशी घोशित केले आहे, करा त्याचा ही एन्कांटर, आसाराम, रामरहीम, रामपाल करा यांचा ही इन्काँटर.
असो थांबतो ..
मुळ मुद्दा हा आहे की स्त्री प्रती आदर असणे ही माणुसकी आहे, पण त्या माणुसकीला काळिमा फासणार्या ह्या बलात्कार घटना आपण कश्या पद्धतीने अटोक्यात आणणार आहोत ? ह्या वर राज्यकर्ते, आपण ठोस काहीच करत नसलो तर फक्त राजकिय फायद्यासाठीच ह्या गोष्टी येथे वापरल्या जाणार असतील तर मला पुन्हा म्हणावे लागेल India Deserves Better.
-------- गणेश जगताप.
#India_Deserves_Better