आपण सर्वजण पाणी पुरी आवडीने खातो. दक्षिण भारतात जेवणात रसम वाढतात, आणि काही हॉटेलात रसम वडा असा प्रकार ही मिळतो. ह्या रसम ची द्रवता पाणी पुरीतल्या पाण्या सारखी असते.
आज माझ्या पत्नीने घरी रसम बनवले होते. एम टी आर चे मद्रास रसम चे पॅकेट वापरले . त्यावर दिलेल्या कृती प्रमाणे हे रसम बनवले. त्याच्यात चिंच आणि गुळाचे पाणी घालायलाही सांगितले आहे. त्यांनी मसूर डाळ वापरायला सांगितले आहे. पण आपण साधे वरण किंवा बेसन वापरून हे रसम बनवु शकतो.पाणी पुरीच्या पुरी मध्ये हे रसम नेहमीच्या पाण्या ऐवजी घालून खाल्ले. हा वेगळा उपक्रम मला आवडला. आपणही अजमावून पहा