पूर्वी वाजपेयीं जेव्हा कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी असत तेव्हा त्याना टिकेचे लक्ष्य केले जाई. तरी जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीसे पाहुन मग टीका करताना धोरण किंचीत बदलण्यात आले. त्यानुसार वाजपेयी सज्जन वा उदारमतवादी होते पण अडवाणी वाईट व असहिष्णू आहेत असा ओरडा केला जाऊ लागला. अडवाणींची उंची वाढतच राहिली. नंतर मोदींचा उदय झाला आणि अडवाणी हे सभ्य व समजूतदार असून मोदी हे समाजात फूट पाडणारे आणि हुकुमशहा असल्याचा शोध लावण्यात आला. त्यानेही मोदींचे काही बिघडले तर नाहीच पण त्यांची उंची वाढत राहिली असे लक्षात आल्यावर कालपरवापर्यंत मोदीना तीव्र विरोध करणाऱ्या ममता दीदी म्हणू लागल्या आहेत कि मोदी बरे आहेत पण अमित शहा वाईट आहेत म्हणुन !
जनता आता पूर्वीप्रमाणे भोळी राहिलेली नाही आणि
असे बदलते पवित्रे फारसे यशस्वी होत नाहीत हे यांच्या कधी लक्षात येणार ?