या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे.
आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत.
तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का?
जिओमुळे बर्याच नेटवर्क कंपन्यांचे धाबे दणाणले.आयडीया,वोडाफोन,एअरटेल यांसारख्या नावाजलेल्या नेटवर्क कंपन्यांनी दरम्यानच्या काळात ग्राहक खेचण्यासाठी विविध योजनाही जाहिर केल्या.अजूनही येताहेत.
आता तर जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या नामांकित कंपन्या एकत्र येताहेत.BSNL सुध्दा काही चांगल्या योजना जाहिर करतंय.
आता फक्त ५ दिवस उरलेत.या ५ दिवसात जिओची मोफत कॉल्स आणि दर महिना २८ GB इंटरनेट एक वर्षासाठी मिळवण्यासाठी ९९ रु.भरुन JIO Prime ही योजना घ्यावी लागेल.त्यानंतर दर महिना ३०३ रु भरुन ही अॉफर वापरता येईल.त्यांच्या इतरही योजना आहेत.त्या इथे पाहता येतील.
https://www.jio.com/
आता जिओसाठी पैसे भरल्यानंतर कॉल ड्रॉप कमी होतील असं वाटतंय का?ज्यांना कामानिमित्य सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे.
या पाच दिवसात अजून काही योजना जाहिर होतील.
संभ्रमावस्था वाढेल.
तर नेमकं काय करावं?घ्यावी जिओ प्राईमची योजना? भरावे दर महिना ३०३ रु.? की इतर कोणतं नेटवर्क निवडावं?
फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना न पाहता आपल्या नेटवर्क संबंधित आवश्यक गरजांची पुर्तता करणारीही हवी!
तुम्ही काय ठरवलंय? जिओच चांगलं वाटतंय की जिओ व्यतिरिक्त आणखी कोणत्या नेटवर्क कंपनीची एखादी योजना फायदेशीर वाटतेय?