- 4569 views
नमस्कार,हे माझे मिपा वरील पहिले लेखन आहे म्हणून काही चूक झाल्यास क्षमा असावी.
-----------------------------------------दुपार झाली आणि गणोबा ला खूप भूक लागली.सकाळी फक्त त्याने रात्रीची उरलेली अर्धी भाकर आणि वरण ऐवढच खालेलं होतं.
"ओ बाबा मले लय भूक लागली हाय पोटामंदे मंगाणपासुन कावळे बोंबलत हाय."
सखाराम ला पण खूप भूक लागली होती.म्हणून जेवण करण्यासाठी दोघे शेताच्या बांधावर बसले.आज चिंगीचा(मुलीचा) वाढदिवस आहे म्हणून त्याच्या अर्धांगिणीने शिरा बनविला होता. खूप दिवसा नंतर आज शिरा खायला मिळणार असल्यामुळे गणोबा खूप घाई करत होता.डबा उघडताचं काही सरकारी माणसे काहीतरी यंत्रे घेऊन त्याच्या जवाळ आली.
एक जण बोलला " सखाराम तुमचं शेत धरणाखाली येणार".
हे ऐकून सखाराम आणि गणोबाच्या घस्या खाली घास उतरत नव्हता.........