- 2757 views
आजुबाजुला मिट्ट काळोख होता. पक्या अजुनही पळतच होता शेताच्या बांधावरुन पळायला नीट जमतही नव्हते , पण जीव वाचवायचा होता , म्हणुन पळावे तर लागणारच होते. पायातील चप्पल अचानक तुटली पण चपलेची पर्वा न करता तो अनवाणी पायानी पळत होता ,गावातील दिवे अजुनही दुरवर दिसत होते , कधी एकदा गाव येते असे पक्याला झाले होते. पण मागुन येत असलेली ती काळी शक्ती आज त्याचा रस्ता संपुन देत नव्हती एकदाची ती काळी शक्ती पक्याजवळ येऊन पोहोचली...पक्याने रानदेवाचे स्मरण केले आणी काय झाले अचानक पक्याच्या अंगात दैवी शक्ती आली आणी तो मागे फिरला ताकदीनीशी त्याने त्या काळ्या शक्तीला दुरवर फेकुन दिले आणि पुन्हा घरी निघाला.