[शतशब्दकथा स्पर्धा]जगणं

सकाळीच लवकर उठलो. खबदाडीमधून किलकिल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं.रात्रीच्या प्रकाराची कुठलीही खूण आजूबाजूला दिसत नव्हती.

काल तो जमाव हातात काठ्या-दगड घेऊन मागे लागला होता.त्यांच्या हाती सापडलो असतो तर तिथेच ठेचलं असतं त्यांनी…. थोडीशी भूक लागली होती म्हणून एक पाव पळवला दुकानातून.

कुठूनसं आणलं गेलं होतं इथे... तो बरोबर असताना असं नव्हतं… हेच लोक माझ्यावर खूष असायचे. अर्थात तो काही सरळपणे देत नव्हताच मला.तो म्हणेल तसंच वागायचं…कंटाळलो सगळ्याला ….

पळून जावंसं वाटलं म्हणून पळालो…अजूनही पळतोय …पण जाऊ तरी कुठे?

आता तो भेटेल की नाही देव जाणे…

अरे…हे समोर काय दिसतंय ?

हो … तोच…पण असा का ??