मराठी सिनेमाना प्राईम टाईम दिला गेला आणि समस्त मंडळीना मिरच्या झोंबल्या. आता हि मंडळी कोण तर ज्यांच्या मुळे मल्टीप्लेक्स चालतात असे सगळे म्हणतात.
का तर ते १०० करोड चे सिनेमे देतात, आता हे १०० करोड कसे होतात तर तिकीट दर वाढवले कि झाले. पण जे लोक खरच मनापासून सिनेमा वर प्रेम करतात त्यांनी मात्र ह्या मध्ये लक्ष दिले नाही. त्यांना हि माहित आहे कि मराठी सिनेमा आता बदलला आहे, जर २ ते ३ करोड मध्ये बनणारा सिनेमा ३० ते ४० करोड कमवत असेल तर तो तथाकथित हिंदी सिनेमा वाल्यांच्या पोटात गोळा आणणारा आहे .
आणि आपल्या कडे नियम केले कि रडत राहणारे दक्षिण भारतात का रडत नाहीत ??????
महेश भट्ट (अतिशय पकाव) का रडत बसला नाही जेव्हा दक्षिण भारतात त्याच्या सिनेमाला चित्रपट गृह मिळाले नाही. जर कायदा असेल तर मग कुठेही जा प्रादेशिक भाषेला नेहमी प्राथमिक दर्जा हवाच.
जेव्हा महाराष्ट्रात असे म्हटले जाते तेव्हा देश तोडायला चाललेली पार्टी म्हणून मनसेची बदनामी केली गेली. पण जेव्हा हीच गोष्ट दिल्ली किंवा चेन्नई किंवा इतर प्रांतात होते तेव्हा कुठे जातात हे लोक ????????
आता मराठी सिनेमा चा मुद्दा आला आहे , क्रांती रेडकर दिग्दर्शित "काकण" या सिनेमाला प्राईम टाईम देण्यास मल्टीप्लेक्स वाले विरोध करत आहेत.
अश्या वेळी त्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री यांच्या कडे जायला पाहिजे होते, पण
त्यांनी राज ठाकरे यांच्या कडे गाऱ्हाणे मांडलेय .
ना ते सत्तेत आहेत ना त्यांच्या कडे कोणतेही पद आहे मग का ??
मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना सत्तेत आहेच कि मग ह्या हरलेल्या माणसाकडे का ????
जर समस्त महाराष्ट्राला वाटतेय ना कि राज ठाकरे काहीच करू शकत नाही मग त्यांच्या कडे जाण्यास काय कारण ??
मोदींनी अदानी ग्रुप सोबत काही मीटिंग केल्या कि ते देशाचे भवितव्य पाहत आहेत , हेच जर नाशिक मध्ये राज साहेबांनी केले तर काहीतरी झोल आहे, बरोबर ना ?? मी तुलना करत नाहीये, जर दोघांची पण पद बाजूला केली तर जे दोघांनी केल ते एक सारखच कि.
तरी पण हरलेल्या माणसाच्या मागे मेडिया वाले तर हात धुवून लागले आहेत, मागे आरे कॉलोनी च्या वेळेस हि तेच.
ज्या वेळेस मुंबई चा development प्लान आला त्या वेळेस नाक मुरडणारी लोकं, राज साहेबांच्या मीटिंग ला हजर.
इतके काय आहे तेच कळत नाहीये त्या हरलेल्या माणसात ………………
मला तुमच्या सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे !!!!