मोदी वगेरे ठीक आहे…महाराष्ट्राला काय ते बोला

मराठी माणसाचा शुद्ध स्वार्थ या भुमिके मधून हा लेख लिहिला आहे.मोदी पंतप्रधान होणे हे देशाच्या भल्याचे वगेरे आहे हे ठीक पण ते पंतप्रधान झाले तर मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील आणि महाराष्ट्राचे नेहमीचे रेल्वे, सरकारी नोकर्या, उसाच्या शेतकरी, सहकार, मुंबई शहर, इतर औद्योगिक वसाहती यांना काय मिळणार? का नुसता मन मोठा करून बाकी प्रदेशाची प्रगती पहायची आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने गप्प बसायचे? सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत. या बाबतीत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवाले जोरात आहेत. कोणाचाही सरकार आला तरी यांच्या राज्यात विकास होताच आहे. नाहीतर (आदरणीय) वाजपेयी पंतप्रधान असताना कर भरला मुंबई ने आणि आधी मेट्रो झाली दिल्लीत. मोठ्या मोठ्या गुंतवणुकी गुजरात आणि कर्नाटक मध्ये होतात. महाराष्ट्राचा काय मार्केटिंग केला या लोकांनी.
आपल्या नक्की अपेक्षा काय आहेत?तुम्हाला काय वाटते?