भीमाशंकर

बारा जोतिर्लिंगापेकी एक , साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या वेळेस भटकंतीला ( it means trak la ) कुठे जायचे याच्यावर विचार झाला , नि सर्वानुमते भीमाशंकर हे ठिकाण निश्चित करण्यात आले . ट्रेकची तारीख ठरली १ Dec 2012. जवाबदारीची वाटणी हि झाली .
ती खालील प्रमाणे :-
धीरज :- जेवण
समीर :- हिशोब
प्रतीक नि तुषार :- प्रवासाची व्यवस्था …

mail, meeting ,नाही ,हो अस करता करता शेवटी १८ सदस्य झालोत ….
१७ मुले + १ मुलगी ( not fair at all)
(नुसती मुलींची संख्या वाढवून नाही हो उपयोग ,त्यांना ट्रेक ला पण यायची सवय लावली पाहिजे )

असो सकाळी ६ वाजताच्या सिंहगड एक्सप्रेसने निघायचे ठरलं .
" ५.३० शार्प @ शिवाजी नगर " smiley

सगळ्यात शेवटी पोहोचणारा मीच म्हणजे ५.४० ला. तो पर्यंत सर्व पाहोचले होतो .
खर तर हा सुखद धक्का होता ….
एवढी वेळ कटीबद्धता पाहून मस्त वाटल .
Headcount , कोण रात्री किती वाजता झोपून लवकर कस उठले , नको नको त्या प्राण्यांनी ( इन्क्लुडींग GF) या सर्वानी कशी झोप मोड केली , इत्यादी इत्यादी कार्यक्रम पार पडले .

१ group photo पण झाला …
ट्रेन आल्यावर जागा कशी पकडायची ( किंवा बळकावयाची ,याची प्लानिंग पण झाली ) ..
खात्या 'पित्या' घराची पोर …. ती जागा पकडणारच ….
ट्रेन आली , जागा पकडली .

मग गाडीमधले सोपस्कार सुरु झालेत ,
जागे वरून होणारा दंगा , जागा मिळून हि दरवाज्यात बसण्याचा तो प्रकार .
चांगली मुलगी पाहून मुद्दाम केलेली fluttering ….... वगेरे वगेरे ….
तश्या नजरेत ' भरतील ' असा ३ ,४ पोरी डब्यात होत्या .

मग एकदाचा आमचा इ स्टाप आला.
कर्जत.....
कर्जत ला उतरून मग सकाळची न्याहारी ( मराठीत सांगायचं झाल तर breakfast ) करायला गेलो .
न्याहारीत कांदापोहे ( हॉटेलचे ) नि वडा सांबर होता .

तो आटोपून मग ट्रेकमधले सर्वात मोठे काम होते , ते रिक्षा वाल्यांशी घासाघीस करून खांडस ( base village ) पर्यंत रिक्षा ठरवणे .
पहिल्यांदा समीर नि प्रतीक पुढे गेले …
नंतर त्यात धीरज सामील झाला.

रिक्षा वाल्यांशी संवाद करून ' सामोपचाराने 'भाडे ठरेल ….
( भाडखाऊनी त्रास दिला ते सांगायला नको )

मग खांडस पर्यंत प्रवास चालू झाला .
रिक्षावाल्यांच्या पण . . ( टिंब टिंब ) प्रमाणे हद्दी असतात , हे त्यावेळेस समजले -)
त्या हद्दी वरून थोडा वाद झाला ….पण त्यांच्या भांडणात आमचा फायदा होऊन आंम्ही काठेवाडी पर्यंत
पोचलो . ( Thanks to Dhiraj smiley )

17 मावळे नी १ माऊली ,यांनी ट्रेक ला सुरुवात केली.
ऑफिसच्या थंड " गार " वातावरणात , खुर्चीवर बसून मजबूत झालेले त्यांचे शरीर ,
किबोर्ड वर टिचक्या मारून झालेले बलदंड बाहु ,

( सकाळचे १०.४५ मिनिटे .. )
अश्या मावळ्यानसाठी भीमाशंकर ट्रेक , रणरणत्या उन्हात करणे काही अवघड नाही .
( असो १ गोष्ट राहिली , ट्रेक चालू करण्यापूर्वी मुलांचा sun cream लावण्याचा कार्यक्रम पार पडला ) मग सुरुवात झाली ट्रेक ची ,
सुरवातीच रस्ता तसा सोप्पा होता ..
जाता जाता १ बोर्ड लागला ,जंगलात कोण कोण ते प्राणी आहे याचा .
त्यात बिबट्या , तरस , माकड इत्यादी इत्यादी निरुपद्रवी प्राण्याचा उल्लेख होता .

पण त्यामध्ये माणसासारख्या उपद्रवी नि घुसखोर प्राण्याचा उल्लेख नाही , हे पाहून वाईट वाटलं .
नंतर थोड चालल्यावर झाडी सुरु झाली , चढण पण कठीण झाली होती .
आणि अर्धा तास चालल्यावर आम्ही आमच्या पहिल्या पडावावर पोहचलो .

गणपती मंदिर ….
मंदिरात ताक पिऊन , पुढे सुरवात झाली .
तसा रस्ता थोडा कठीण आणि चढण्याचा होता , पण आजूबाजूला झाडी असल्यामुळे आणि ताजेतवाने असल्याने चढता येत होते.

काही वेळाने एका पठारावर आलो .
त्या पूर्वी २,४ सुकलेले धबधबे पार केलेत.
या दरम्यान १ प्रसंग झाला , पठारावर कोणीतरी रात्री पार्टी केली होती .
प्लास्टिक , कचरा , बियरच्या कॅनस ,प्लेटस वगेरे वगेरे पडल्या होत्या .
निसर्गात येऊन निसर्गाची एवढी अव्हेलाना.
सोटा घेऊन त्यांना अश्या जागेवर फटके मारले पाहिजे कि रोज सकाळी आठवण झाली पाहिजे .
असो , आम्ही कचरा आवरायला सरसावलो .नी १० मिनिटात तो सर्व कचरा आवरला गेला .
आता बॅगेसोबत कचऱ्याच्या हि पिशव्या घेऊन चालू लागलो .

हौशी मंडळी त्यांच्या कॅमेरातून स्थितःचित्रे ( means photos) काढत होती .
मस्त view दिसत होता . खाली छोटासा झरा होता , आजुबाजूची शेती , छोटी पण टुमदार घर आणि पुढे पठारावर असलेली घनदाट झाडी .
त्या झाडीतून चालत चालत थकवा निघून गेला , हो पण भूक लागली होती .
trek

trek1

चालत चालत जवळ जवळ २.३० तास झाले होते , मग १ कामचलाऊ झोपडीच्या इथे आम्ही " दुपारचा LUNCH "घेतला .
जेवणात मेथी पराठे , चटणी नी बटाट्याची भाजी , आणि भुकेल्या मावळ्यांनी ( Google suggested मवाल्यांनी ) सर्व संपवली .

trek3

trek2

त्यातच धीरज नी २ कविता ऐकवल्या .
( कवी लोकांना काय फुकट श्रोते मिळाले कि काय ते सुरु होतात smiley )
असो..४५ मिनिटे आराम करून ट्रेकिंगचा दुसरा टप्पा सुरु झाला .

त्या वेळेस बरोबर घडाळ्यात दुपारचे २.१५ वाजले होते .
पोट पुढे आलेल्या पोटात पोटभर ढकललं होत ,पण पुढची चढण पाहून पोटात गोळा आला .
भरीत भर ( खाणे नाही ) चढताना नावालाही सावली नाही , सूर्य डोक्यावर ,
अशी बिकट परिस्थितही आमची पावले आम्हाला घेऊन चढू लागली. smiley
साधरण बोटावर मोजून ,१० मिनिटे झाली असतील , नी सर्वांनी इ स्टाप घेतला .

पाणी हि तसं आता मोजकच उरल होत .
सर्वात वरती चढण्यात होते , समीर ( हवा का झोका ) and one & only the greatमृणाल.

त्या मागे हि बरीच मंडळी होती ,
क्रमाक्रमाने सर्व मंडळी जात होती , पण सर्वात शेवटी होता , विवेक the शर्मा .
' भारदस्त ' व्यक्तीमत्वाची , ' वजनदार ' असामी .

पंजाबदा पुत्तर भटीनडे दि शान ,
अपना विवेक यार्र !!!
तर विवेक नी धीरज सर्वात शेवटी .
विवेक दर ५ मिनिटांनी १० मिनिटे थांबत होता .
२ घोट पाणी म्हणून १/२ बाटली पाणी पित होता .
उन्हाने चेहरा लाल झाला होता ..
विवेकला घेऊन चढण्याची तुलना हि फक्त तोफ घेऊन गडावर चढण्याशी होऊ शकते .
अशातच काही सदस्य पुढे गेले होते .
रस्ता जरी डाव्या बाजूला जायचा असला तरी थोडस उजव्या अंगाला वरती , प्रतीक , भूषण नी तुषार दिसत होते .
थोड जवळ गेल्यावर समजल , नको त्या जागेची मस्ती त्यांना नडली होती , नी शॉटकट म्हणून ते तिकडे गेले .

आता पुढे जाणे अशक्य झाले लक्षात आल्यावर ते परत आले .
इकडे धीरजचा विवेकशी , नी विवेकचा स्व:ताशी संघर्ष चालू झाला .
शेवटी विवेक ने pen killer ( दुखाशामक गोळी ) घेऊन धीरज नी इतरांचा pain कमी केला .
कौशिक पण आता थकला होता , तरी तो चालत होता .
आता चढण संपून सरळ झाडीचा रस्ता लागल होता .
सूर्य पण डोंगराच्या दुसरया बाजूला गेल्यामुळे मस्त सावली आली होती .
समोरून काही गावकरी येत होती .
मंदिर किती दूर ? विचारल्यावर १० मिनिटे म्हटली ,
विवेकने ते ऐकून भारी dialog मारला " धीरज भाई ये १० मिनिट मतलब , गावावलोके १/२ घंटा है .
घंटा SS हम जल्दी पोहचणे वाले है !”
एकंदरी शेवटी घाम गाळात , थांबत ,चालत आम्ही वरती पहोचालो .
वरती पाण्याचे भारतात स्वच्छ म्हणता येईल अस तळं होत.
मंदिर ५ ते १० मिनिटे अंतरावर होते ….
( FB वरच वाक्य आहे , भारतात अंतर वेळेत मोजतात )
हात पाय धूऊन चालत चालत मंदिराच्या पायऱ्यानशी पोहचलो .
तेथे ओंकार , समीर नी प्रतीक होते , त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या शेवटी येणाऱ्यानसाठी आणून ठेवल्या होत्या . सोबत शोऐब नी लिओ पण होते .
( आमच्या इथले शंकर एहसान , लॉय म्हणजे " सिवा , शोऐब नी लिओ )
काही आस्तिक लोक देवळात गेली होती . काही तिथे माणसातल्या देवासाठी थांबली होती .
तो पर्यंत घड्याळ्यात ४.२० झाले होते .५ वाजता पुण्याला जायची बस पकडायची होती .
सो हळू हळू सर्व जमा होऊन ५ वाजे पर्यंत बस स्टाप वर गेलो .
सगळे fresh झालो , चहा , जुस , कणीस पोटात ढकलू लागलो .
काही लोक बेंचवर पहुडली , काही गप्पांचे फड रमले .

पण सर्वात आतापर्यंत सुंदर गोष्ट पाहायला मिळाली , तो म्हणजे सूर्यास्त .
क्षितिजावर होणारा सूर्यास्त , तो संधीप्रकाश , खाली दिसणारी ते डोंगर नी झाडी सर्व कस मंत्र मुग्ध करणारे . या निसर्गदेवते समोर काहींचे कॅमरे लवले तर काहींच्या माना .
संध्याकाळचे ६.१५ वाजले होते , ५ वाजताची बस अजून आली नव्हती .
तसा भारतीय " प्रमाण " वेळे नुसार पण एवढा ' वेळ ' नको व्हयला.

मग पुण्याला जाण्यासाठी दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात झाली .
पर्याय १ . भीमाशंकर वरून मंचर ला जायचे , व तिथून पुण्याला .
यात बरीच अनिश्चितता होती . १८ लोकांना वाहन मिळणे कठीण .

पर्याय २ .पुण्यासाठी थेट गाडी शोधणे .
तशी थेट गाडी मिळणे कठीण , परत १८ लोक . smiley
पर्याय ३. भिमाशंकरला मुक्काम करणे .
हा सर्वात शेवटचा पर्याय निवडण्यात आला.
पर्याय ४. परत रात्री उतरून खांडस ला जाणे . ( suggested by prateek )
ह्या पर्यायावर प्रतीक ला शिव्या टाकण्यात आल्या हे सांगायला नको .आणि पर्याय खारीज करण्यात आला.
अंधार दाटला होता नी लख्खं चांदण न्हाल होते .
खूप दिवसांनी ( रात्रीनी ) असं चांदणे पहिले होते .
रणरणत उन्हं , सावली , सूर्यास्त नी आता चांदण . निसर्ग हि माणसाच्या मनासारखंच असतो .

त्यातच १ गाडी भेटली . Direct पुण्या पर्यंत , पण त्यात १८ लोकं मावली नाही . smiley
उतरल्यावर दुरून मोठा Head light दिसला , आणि बस आली .
पण ती बस महामंडळाची नसून खाजगी होती .
त्यातून ' माल ' म्हणता येतील असा पोरी उतरल्या . (साधारण ३० एक पोरी असतील )
कोणीतरी "स्पाय" गिरी करून , माहिती मिळवली ,त्या पोरी night ट्रेकला आल्या होत्या .
त्यातच कोणीतरी आपणही " Night “ ट्रेक करावा असा सल्ला दिला .
आणि बहुतेक मुलांनी त्याला समर्थन दिले .
तितक्यात १ बस आली महामंडळाची , पण ती कल्याण साठी होती .
त्या बस ड्रायव्हर ने मागून पुण्याची बस येत आहे अस सांगितलं .
आणि शेवटी १५ मिनिटांनी पुण्याची बस आली , त्या वेळेस घडाळ्यात ०७.१५ मिनिटे झाली होती .पुन्हा जागा पकडण्याचे सोपस्कार झालेत आणि बस मध्ये आम्ही बसलो .

बस सुरु झाले , सर्व पेंगू लागली .
डोळे मिटले गेले.
खरच trek म्हणजे काय ?

नुसता डोंगरावर चढणे. का पाठीवर bag नी गळ्यात कॅमेरा लटकावून हिंडणे .
नाही , ट्रेकमुळे निसर्गाच्या जवळ गेलो. रेल्वेतून पाहिलेला खंडाळ्याचा घाट , टमटम मधून ( रिक्षा) पाहिलेले खांडस गाव . भर उन्हात चढताना अनुभवलेला डोंगर , अंगाला शांत करणारी सावली ,
झोपडीत घेतलेलं जेवण , एकमेकांची साथ देत गाठलेले शिखर , शंकरा पुढे नतमस्तक झालेले मस्तक , स्वच्छ पाहिलेले ते चांदणे , नी आता शांत मिटलेले डोळे.

सगळचं अद्वितीय !!!!
I always say , “Trek builds your character “
what say guys ?

धीरज भंडारे.
dhiraj.bhandare@gmail.com