कोपरगांव माहितिये ? साईबाबांच्या शिर्डी पासून फक्त १७ किमी वर. २ साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध. मी साधारण १९९२ पासून जातोय. मुद्द्याचं म्हणजे : इथे एक भार्री जेवणाची जागा आहे. "तृप्ती भोजनालय ".
आम्ही , म्हणजे मी आणी माझा मित्र अजय , कधी कधी उशीरा पोचलोय तेव्हां आम्ही चक्क बंद केलेलं शटर सुधा उघडायला लावलेलय. दिवस भराचं काम सम्पवायचं आणी तृप्ती मधलं जेवण हाणायचं.
आज सुधा तीच चव, तश्शीच व्यवस्था, तोच आखडू मालक.१९७७ पासून चालू आहे म्हणे. म्हणजे बघा , आपण जर प्रेमानी त्याचं कौतुक करायला गेलो , तर हा मनुष्य बिल्कूल बोलत नाही. फोटो काढायला दिले हेच नशीब. खरं म्हणजे छोटासा इंटर्व्यू घ्यायचा प्लान होता माझा.असो. त~हेवाईक असेनाका. जेवण मात्र एक नंबर. "टमाटो प्लेट" वगैरे म्हणजे खासियत.पोळ्या गरमागरम. ठेचा लय भारी.
फक्त टायमिंग मधे या. रात्री आलात तर ९ नंतर मिळणार नाही. मालक तुमच्या "विनंती" ला वगैरे बधला तर माझ्या बरोबर पार्टी. मुद्दा - वेळात जा , फार गोड बोलण्याची अपेक्षा ठेवू नका. [पुण्यातले असाल तर सोप्पं जाईल]. पण एवढं साधं [??] पथ्य पाळलत तर ला-जवाब जेवण मिळेल हे नक्की.
कोपरगाव बस स्टँड पासून अगदी जवळ आहे. कोणालाही विचारलं तरी सांगतील.
इथला हा फळा बघा तर :-

सर्वात खालची टीप पाहून मी वर काय म्हणतोय ते लग्गेच कळेल !
असो. उत्तम जेवणाचा आस्वाद घ्याच !